अ‍ॅपशहर

ओढ्यात पडून तरुणाचा मृत्यू

वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील कुर्तवडी गावातील ओढ्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांनी गोंडेखल येथे बुधवारी दुपारी सापडला.

Maharashtra Times 20 Jul 2017, 3:00 am
भोर : वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील कुर्तवडी गावातील ओढ्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह चार दिवसांनी गोंडेखल येथे बुधवारी दुपारी सापडला. जितेंद्र प्रकाश आंबेगावकर (वय ३६, रा. बुधवार पेठ, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth drowns in runnel in velhe taluka in pune district
ओढ्यात पडून तरुणाचा मृत्यू


आंबेगावकर यांचा गेले चार दिवस शोध सुरू होता. पानशेत धरणापासून सुमारे २५ किमी अंतरावर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कुर्तवडी गाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावकर रविवारी आपल्या मित्रांसोबत पानशेतवरून कुर्तवडी येथे राहणाऱ्या मित्रांकडे चारचाकी गाडी घेऊन निघाला होता. या परिसरांत गेल्या आठवड्यापासून मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे दुथडी भरून वाहत आहेत. कुर्तवडीजवळ आल्यावर आंबी नदीवरील एका ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याचा वेगही खूप होता. पाणी कीती आहे याचा अंदाज घेण्यासाठी जितेंद्र पुलावर गेला. परंतु, पुलावरील शेवाळावरून त्याचा पाय घसरला आणि तो वाहून गेला. कारमधील मित्रांनी मदतीसाठी हाका मारल्या. परंतु, आसपास कोणीही नव्हते. या ओढ्याचे पाणी पानशेत धरणात जाऊन मिळते. त्यामुळे पानशेत धरण परिसरात पुणे अग्निशमन दल आणि स्थानिकांमार्फत त्याचा शोध सुरू होता.

वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागांत पावसाळ्यात पर्यटक, नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेऊन फिरावे. अतिधाडसाचे पाऊल कोणीही उचलू नये, असे वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज