ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये ‘झिरो पेंडन्सी’ योजना राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून नागरिकांना फायदा होईल,’ असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषयी समिती सभापती, सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या राज्यस्तरीय विकास परिषदेचे आयोजित पुण्यात पुणे जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये विविध चर्चा आणि निणयांबाबत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुंडे म्हणाल्या, ‘पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकात दळवी यांनी पुणे विभागातील जिल्हा परिषदांमध्ये ‘झिरो पेडन्सी’ ही योजना प्रभावीपणे राबविली आहे. या येजनेचे सादरीकरण विकास परिषदेमध्ये करण्यात आले. त्यानंतर ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा नागरिकांना होणार आहे.’
आरोग्य आणि शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली असता त्या म्हणाल्या, ‘कर्मचारी भरतीच्या केंद्रीय पद्धतीमुळे विलंब होत आहे. महिला व बालकल्याण विभागामध्येही अनेक पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखती वेळेत घेण्याबाबतचे वेळापत्रक करण्याचे सुचविले जाणार आहे.’
‘राज्यातील जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींना आधिकाधिक आधिकार देऊन अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. राज्याच्या योजना जिल्हा परिषदांकडे हस्तातंरित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. याबद्दल केंद्र सरकारकडून राज्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाही प्रभावी पद्धतीने राबविण्यात येत आहे. स्मार्ट ग्राम योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
……..
भगवान गडाबाबतचा निर्णय योग्य वेळी
भगवान गडावर गेल्यावर्षी झालेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी मेळावा होणार का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर मुंडे म्हणाल्या, ‘भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल.’
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये ‘झिरो पेंडन्सी’ योजना राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून नागरिकांना फायदा होईल,’ असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषयी समिती सभापती, सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या राज्यस्तरीय विकास परिषदेचे आयोजित पुण्यात पुणे जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये विविध चर्चा आणि निणयांबाबत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुंडे म्हणाल्या, ‘पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकात दळवी यांनी पुणे विभागातील जिल्हा परिषदांमध्ये ‘झिरो पेडन्सी’ ही योजना प्रभावीपणे राबविली आहे. या येजनेचे सादरीकरण विकास परिषदेमध्ये करण्यात आले. त्यानंतर ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा नागरिकांना होणार आहे.’
आरोग्य आणि शिक्षण विभागात अनेक पदे रिक्त आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली असता त्या म्हणाल्या, ‘कर्मचारी भरतीच्या केंद्रीय पद्धतीमुळे विलंब होत आहे. महिला व बालकल्याण विभागामध्येही अनेक पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखती वेळेत घेण्याबाबतचे वेळापत्रक करण्याचे सुचविले जाणार आहे.’
‘राज्यातील जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींना आधिकाधिक आधिकार देऊन अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. राज्याच्या योजना जिल्हा परिषदांकडे हस्तातंरित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. याबद्दल केंद्र सरकारकडून राज्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाही प्रभावी पद्धतीने राबविण्यात येत आहे. स्मार्ट ग्राम योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
……..
भगवान गडाबाबतचा निर्णय योग्य वेळी
भगवान गडावर गेल्यावर्षी झालेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी मेळावा होणार का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर मुंडे म्हणाल्या, ‘भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल.’