अ‍ॅपशहर

जम्मू काश्मीरच्या सीमेवर महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण, पत्नी-मुलासह कुटुंबावर शोककळा

Jammu and Kashmir Border : शहीद राहूल आनंद भगत यांचे पार्थिव भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांच्या गावी आणल्यावर त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 12:51 pm
रायगड : जम्मू काश्मीरमधील दूर्गम भागातील सीमेवर देशसेवा करत असताना रायगड जिल्ह्यातील जवानाला काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले आहे. महाड येथील राहुल आनंद भगत (२८) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. राहुल यांच्यामागे आई वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. राहुल भगत यांचे कुटुंब (पत्नी आणि मुलगा) ठाण्यात राहतात. तर आई वडील व भाऊ हे इसाने कांबळे येथे राहतात. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमीत्ताने देशभरात पाळण्यात येणाऱ्या अहिंसा दिनीच राहूल भगत यांना विरगती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu and kashmir latest news


जम्मू काश्मीरमधील दूर्गम भागातील सीमेवर कार्यरत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावातील जवान राहूल आनंद भगत परकियांबरोबर मुकाबला करिता असताना रविवार (दि. २ ऑक्टोबर) रोजी संध्याकाळी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी शहीद झाले असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

विमानतळावर तरुणाची चेकिंग केली पण काही सापडलं नाही, अखेर अंडरवेअरमध्ये तपासलं असता पोलीस चक्रावले
दरम्यान शहीद राहूल भगत यांच्यामागे पत्नी, मुलगा, आई व वडिल असा परिवार असल्याची माहिती महाड उप विभागीय महसुल अधिकारी प्रतिमा पूदलवाड यांनी दिली. शहीद राहूल भगत यांचे पार्थीव मंगळवारी त्यांच्या मुळ गावी म्हणजे ईसाने कांबळे येथे आणण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शहीद, राहूल आनंद भगत यांचे पार्थिव भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांच्या गावी आणल्यावर त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाइन' जवळ बोलताना सांगितले.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज