रायगड : नववर्ष आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांकडून सहलींचं आयोजन केलं जातं. औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेची सहल रायगड जिल्ह्यात आली होती. रायगडच्या काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर शाळेचे विद्यार्थी पोहोचले होते. यापैकी चार विद्यार्थी समुद्र किनाऱ्यावर बुडाले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालयाचे हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे ,तहसीलदार रोहन शिंदे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दोन विद्यार्थ्यांचा शोध सुरु
औरंगाबादच्या कन्नड मधील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल रायगडच्या काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचली होती. यापैकी चार विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.
स्थानिक पथकांकडून बचावकार्य
मुरुड तालुक्यातील काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर चार विद्यार्थी बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात आलं आहे. कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि सात शिक्षक सहलीसाठी आले होते. काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरुन विद्यार्थी आनंद घेत होते. त्यापैकी काही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते पाण्यात बुडाले. ही बाब समोर येताच खळबळ उडाली होती. स्थानिक बचाव पथकांनी प्रयत्न केल्यानं दोन जणांना वाचवण्यात आलं आहे.
अहमदनगरचे नामांतर आणि विभाजनही होईल, अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांना विश्वास
अलिबागमध्ये उपचार
चार पैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्यानंतर त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर, बेपत्ता असलेल्या पाण्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रणय कदम, रोहन संतोष बेडवाल, कृष्णा विजय पाटील आणि तुषार हरीभाऊ वाघ हे चार विद्ययार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Worli : वरळीत अविघ्न इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू
विद्यार्थी शिक्षकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक
राज्यात शालेय आणि महाविद्यालयीन सहलींचं आयोजन डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात केलं जातं. सहलींचं आयोजन करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या घटना घडू शकतात. महाराष्ट्रात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी देखील स्वत: सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे.
रोहित पवारांची निवड धक्कादायक; परंपरेला धोका आणि नुकसान करणारी- राम शिंदे
दोन विद्यार्थ्यांचा शोध सुरु
औरंगाबादच्या कन्नड मधील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल रायगडच्या काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचली होती. यापैकी चार विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत.
स्थानिक पथकांकडून बचावकार्य
मुरुड तालुक्यातील काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर चार विद्यार्थी बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात आलं आहे. कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि सात शिक्षक सहलीसाठी आले होते. काशिद समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरुन विद्यार्थी आनंद घेत होते. त्यापैकी काही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं ते पाण्यात बुडाले. ही बाब समोर येताच खळबळ उडाली होती. स्थानिक बचाव पथकांनी प्रयत्न केल्यानं दोन जणांना वाचवण्यात आलं आहे.
अहमदनगरचे नामांतर आणि विभाजनही होईल, अहिल्यादेवींचे वंशज राम शिंदे यांना विश्वास
अलिबागमध्ये उपचार
चार पैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्यानंतर त्यांना अलिबाग येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर, बेपत्ता असलेल्या पाण्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रणय कदम, रोहन संतोष बेडवाल, कृष्णा विजय पाटील आणि तुषार हरीभाऊ वाघ हे चार विद्ययार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. कृष्णा पाटील आणि कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. प्रणय कदम आणि रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Worli : वरळीत अविघ्न इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू
विद्यार्थी शिक्षकांनी सतर्कता बाळगणं आवश्यक
राज्यात शालेय आणि महाविद्यालयीन सहलींचं आयोजन डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात केलं जातं. सहलींचं आयोजन करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या घटना घडू शकतात. महाराष्ट्रात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी देखील स्वत: सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे.
रोहित पवारांची निवड धक्कादायक; परंपरेला धोका आणि नुकसान करणारी- राम शिंदे