मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले. सावर्डे-आगवे वळणावर ही खासगी बस उलटून हा अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी परळहून मालवणला जात होते.
विशाल ट्रॅव्हल्सची बस (एम एच 46 जे 5252) ही बस मुंबईहून मालवणला जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सावर्डे-आगवे येथील धोकादायक वळणावर ही बस उलटली. पहाटे ४.१५ वाजता हा अपघात झाला. याघटनेत बसमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. अपघातानंतर उलटलेल्या बसमधून मोठ्या प्रयत्नाने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना डेरवणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले. सावर्डे-आगवे वळणावर ही खासगी बस उलटून हा अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी परळहून मालवणला जात होते.
विशाल ट्रॅव्हल्सची बस (एम एच 46 जे 5252) ही बस मुंबईहून मालवणला जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सावर्डे-आगवे येथील धोकादायक वळणावर ही बस उलटली. पहाटे ४.१५ वाजता हा अपघात झाला. याघटनेत बसमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. अपघातानंतर उलटलेल्या बसमधून मोठ्या प्रयत्नाने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना डेरवणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.