अ‍ॅपशहर

कोकण तापले! आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीवरून भडकले 'बॅनर वॉर'

नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्याने तो आता इतर ठिकाणी नेण्याचा विचार आहे. दुसरीकडे, आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असल्याने आता रिफायनरीवरून बॅनर वॉर रंगले आहे. राजापुरात रिफायनरी नको, असे बॅनर लावण्यात आले आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2022, 4:45 pm
राजापूर, रत्नागिरी : कोकणात पुन्हा एकदा नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेने युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज राजापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीच बॅनर युद्ध भडकले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aditya thackeray visits ratnagiri protest against refinery project in rajapur
कोकण तापले! आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीवरून भडकले 'बॅनर वॉर'


आदित्य ठाकरे राजापूरचा दौरा करणार असल्याने तालुक्यातील पश्चिम भागात रिफायनरी प्रकल्पावरून बॅनरबाजी दिसून येत आहे. रिफायनरीच्या बाजूने आणि रिफायनरीच्या विरोधात अशा दोन्ही बाजूने रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती आदित्य ठाकरे यांना बॅनरमधून नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे खारेपाटणपासून राजापूरपर्यंत स्वागताचे बॅनर लावले आहेत. रस्त्यांवर अशा प्रकारे समर्थनाचे आणि विरोधाचे बॅनर लावलेले दिसत आहेत.

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्याने तो कोकणात इतर ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. नागरिकांमधून रिफायनरिला विरोध आणि समर्थन देखील दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आदित्य ठाकरेंचा राजापूर दौरा


कोकणातील रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक? आदित्य ठाकरेचं मोठं वक्तव्य

राजापूरमध्ये आदित्य ठाकेर दाखल झाले आहेत. प्रकल्प समर्थकांशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी महिला समर्थकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली. महिलांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी उत्तरही दिले. आदित्य ठाकरे यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले....

दोन्ही बाजूंनी निवेदनं आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला सुद्धा भेटणार आहे. त्यांचा विरोध आहे. एक भूमिका स्पष्ट आहे जी नाणारच्या समर्थनमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूने नाणारला विरोध आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणार आहे त्याचबरोबर कंपनीशी पण चर्चा केली जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केला जाईल. प्रकल्प हा झाला पाहिजे. पण तो शाश्वत झाला पाहिजे, अशी भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली.

महत्वाचे लेख