अ‍ॅपशहर

कोकणातील शिवसेनेचे नेते 'ईडी'च्या रडारवर?, प्रसाद लाड यांचे रत्नागिरीत मोठे वक्तव्य

भाजप नेते प्रसाद लाड यांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यासोबतच संजय राऊत यांची मनस्थिती बिघडल्याची टीकाही त्यांनी केली. शरद पवारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे लाड म्हणाले.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2022, 5:08 pm
रत्नागिरी : नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. त्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तसेच नाणार येथील जमिनी कुणी, किती रूपयांना खरेदी केल्या याची चौकशी झाली पाहिजे. त्यात सगळे सत्य समोर येईल. आधी विरोध करायचा नंतर साटंलोटं करायचं, ही शिवसेनेची भूमिका यापूर्वी देखील राहिल्याची आहे, असा घाणाघात करत भाजप नेते प्रसाद लाड यांनी समृद्धी महामार्गाचं उदाहरण दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp leader prasad lad slams shiv sena over refinery project and ed action
कोकणातील शिवसेनेचे नेते 'ईडी'च्या रडारवर!, प्रसाद लाड यांचे रत्नागिरीत मोठे वक्तव्य


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजप राष्ट्रवादीसोबत कदापी जाणार नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते पंतप्रधानांना भेटू शकतात. सध्या राज्यात होत असलेली कारवाई, संजय राऊत यांच्यावरील कारवाई किंवा राज्यातील इतर प्रश्नांवर ही भेट झालेली असू शकते, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी पवार - मोदी भेटीवर दिली.

संजय राऊत यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सुन सांगावे लागेल. किरीट सोमय्यांनी राऊत यांना काय ते उत्तर दिलं आहे. सोमय्यांना फसवण्याचं काम राऊत आणि गँग करत आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे लाड म्हणाले. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ED in Konkan: ईडीची नजर आता कोकणावर;आघाडीतील बड्या नेत्याच्या भावाची झाली चौकशी?

केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई कधीही संपत नाही. त्यांची कारवाई २५ ते ३० वर्षे चालते. ती न्यायालयातून चालते. मुंबईच्या पोलिस आयुक्तांना कारवाईची एक लिस्ट दिली गेली आहे. डोळ्यात डोळे घालण्याचं आव्हान आम्हाला दिलं आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. अरेला कारे करणारे आम्ही आहोत, असं थेट आव्हान लाड यांनी शिवसेनेला दिलं आहे.

Rajapur Refinery Project : राजापूरमध्ये लवकरच होणार रिफायनरीचे भूमिपूजन!; शिष्टमंडळ

कोकणातील पाच विभागातील शिवसेनेतील नाराज आमच्या संपर्कात आहेत. २०२४ मध्ये भाजपचे १० ते ११ आमदार निवडून येतील. तर २ खासदार भाजपचे असतील. शिवसेनेतील नाराजी, हिंदुत्वाचा मुद्दा सोडणे, कामं न होणं याबाबत शिवसेनेतील नेते नाराज आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते देखील संपर्कात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज