अ‍ॅपशहर

मुंबई-गोवा मार्गावर बसला अपघात, २ ठार

मुंबईहून देवगडकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अंजनारी घाटात अपघात झाला आहे. अपघातात २ ठार तर १८ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे.

Maharashtra Times 4 Sep 2016, 10:39 am
मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus accident in ratnagiri
मुंबई-गोवा मार्गावर बसला अपघात, २ ठार


मुंबईहून देवगडकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अंजणारी घाटात अपघात झाला आहे. अपघातात २ ठार तर १८ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.

लांजाजवळच्या अंजणारी घाटात पहाटे एका खासगी बसला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातातील जखमींवर लांज्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गणपतीसाठी कोकणात निघालेल्या खासगी वाहने, ट्रॅव्हल्स, एसटी बस यामुळे शनिवारी रात्रीपासून मुंबई-गोवा महामार्गावर तुफान गर्दी झाली होती. त्यातच सायन-पनवेल महामार्गावर जागोजागी अनेक गाड्यांचे ब्रेक डाऊन झाल्याने आणि थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज