अ‍ॅपशहर

'सक्ती'च्या भूसंपादनाविरोधात उपोषणाचा इशारा

रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू केलेले सक्तीचे भूसंपादन त्वरीत थांबवण्यात यावे, अन्यथा ऑगस्टपासून सर्व शेतकरी बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने सरकारला दिला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2017, 7:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रायगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corridor anti farmers fight committee
'सक्ती'च्या भूसंपादनाविरोधात उपोषणाचा इशारा


रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू केलेले सक्तीचे भूसंपादन त्वरीत थांबवण्यात यावे, अन्यथा ऑगस्टपासून सर्व शेतकरी बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने सरकारला दिला आहे.

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉरसाठी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जमीन संपादन केली जात आहे. शेतकऱ्यांवर कोणतीही सक्ती करणार नाही असं म्हणणारं सरकार आता हे त्यांचं आश्वासन स्वतःच मोडीत काढत आहे. शेतकऱ्यांकडील भातशेती व सिंचित जमिनी सरकार जबरदस्तीने घेऊ पाहत आहे, ही सक्ती त्वरीत थांबावी अशी आमची मागणी आहे. सरकारने जर हे थांबवले नाही तर येत्या ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करू, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या उल्का महाजन यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांवर दलालांमार्फत दबाव आणला जात आहे. जर जमिनी दिल्या नाहीत तर १८ लाख रुपये मिळणार नाहीत. नुकसान भरपाई बाबत कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही, आक्षेप घेणार नाही आणि घर बांधकाम, झाडे, विहीर यांची कोणतीही नुकसान भरपाई मागणार नाही, नोकरी मागणार नाही, नोकरीसाठी आम्ही बांधिल नाही, असे शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर खोटे लिहून घेतले जात आहे. हा सर्व प्रकार सरकारने त्वरित थांबवावा तसेच नुकसानभरपाईच्या वाटपात महसूल खात्याकडून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप उल्का महाजन यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज