अ‍ॅपशहर

बापरे! किल्ले रायगडच्या पायथ्याशी गावातील डोंगराला मोठी भेग, नागरिकांचं स्थलांतरण सुरू

२०२१च्या जुलै महिन्यात घडलेली तळीये गावातील दुर्घटना आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. अशीच काहीशी भीती आता रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. कारण इथे चक्क डोंगराला मोठी भेग पडली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2022, 11:30 am
रायगड : कोकणातील गेले चार पाच दिवस पावसाने जोरदार बँटिंग सुरू केली असून दरडींच्या भीतीमुळे वरंध घाटरस्ता बंद करण्याची वेळ आली आहे. तर महाड तालुक्यात बावणे गावात वस्तीपासून अर्ध्या किलोमीटरवर अंतरावर एका डोंगरावर मोठी शंभर मीटर लांब भेग पडली आहे. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crack in the mountain


मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरावरची ही भेग आठ ते दहा फूट खोल असावी असा अंदाज आहे. हा प्रकार शुक्रवारी लक्षात येताच तहसीलदार सुरेश शिद यांनी गावात रात्री उशिरा भेट दिली आहे. रायगडच्या पायथ्याजवळ हे गाव असून महाड शहरापासून अंदाजे पंचवीस ते तीस किमलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, २ मित्र सकाळी व्यायामाला जाताना...
दरम्यान, ग्रामस्थांना सुरक्षा उपाय म्हणून जवळपास नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी महसुल प्रशासन त्या गावात दाखल झाले असून जवळपास १२० ते १४० लोकांना कुटुंबासह स्थलांतरित होण्यासाठी हालचाल सुरू झाल्या आहेत. वस्ती पासून भेग पडलेला हा भाग जवळच असल्याने याची व्याप्ती भविष्यात वाढण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणूनच प्रशासन सावध झाले आहे. ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने हलवण्याची तयारी सुरू झाली आहे.

हेही पाहा - तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

महाड तहसीलदार सुरेश शिद हे सुद्धा थोड्याच वेळात पुन्हा या बावणे गावात जाणार आहेत. या गावात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. प्रशासनाकडून जवळच्या गावात मंदिर, समाजमंदीर इथे ग्रामस्थांना सुरक्षितता म्हणून हलवण्यासाठी तयारी सुरू आहे. पण या गावावस्तीला कोणताही धोका बसणार नाही असे प्रशासनाचे मत असले तरी सावधगिरी सुरक्षितता म्हणून या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज