सिंधुदुर्गः महापूर येऊन गेल्यानंतर त्याची तीव्रता आता अधिक जाणवू लागली आहे. मालवण आणि जिल्ह्याच्या अन्य भागात दरडी कोसळण्याचा तसेच डोंगर खचण्याचे प्रकार झाले आहेत. शिर्शिंगे, झोळंबे, सरंबळ, असनिये, तुळस या भागातील डोंगर खचून लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. तसेच सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी आज दुर्गम भागात मोटरसायकलने प्रवास करत परिस्थितीची पाहणी केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपदग्रस्तांना तातडीची मदत देण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. आपदग्रस्तांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे औषध पुरवठा आणि दूध पावडर यांचे वाटप करण्यात येणार आहेत. उद्या शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत दूध आणि भाजीपाल्याचे मोफत वाटप केले.
सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी आज दुर्गम भागात मोटरसायकलने प्रवास करत परिस्थितीची पाहणी केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपदग्रस्तांना तातडीची मदत देण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. आपदग्रस्तांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे औषध पुरवठा आणि दूध पावडर यांचे वाटप करण्यात येणार आहेत. उद्या शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी आज कणकवलीत दूध आणि भाजीपाल्याचे मोफत वाटप केले.