रत्नागिरी: कोकणातील देवरुख परिसरात शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये सासू आणि सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मे महिन्यात जिल्हयात यंदा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी मंदिराचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय मुंबईतील वाशी येथून आपल्या घरी येत होते. स्विफ्ट डिझायर कार (एमएच 02 सीआर 5241) शुभम दीपक सावंत चालवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची गाडी पाटगाव घाटीच्या पुढे हॉटेल हिल पॉईंट येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. गाडी वेगात असल्याने यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या. (Accident in Devrukh konkan)
कारमधून चारजण प्रवास करीत होते. त्यांना घरी पोहचण्यासाठी केवळ अडीच ते तीन किलोमीटर एवढाच प्रवास करायचा बाकी होता. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातामुळे वाडीवर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार या घटनेचा करत आहेत.
कारमधून चारजण प्रवास करीत होते. त्यांना घरी पोहचण्यासाठी केवळ अडीच ते तीन किलोमीटर एवढाच प्रवास करायचा बाकी होता. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातामुळे वाडीवर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार या घटनेचा करत आहेत.