अ‍ॅपशहर

भाजपला सल्ला देण्याचा शिवसेनेला अधिकार काय?: राणे

शिवसेनेने भाजपसोबत मैत्रीसाठी नव्हे तर फायद्यासाठी युती केली आहे. शिवसेना केवळ मैत्रीच्या गप्पा मारते. मात्र मैत्रीचं पावित्र्य जपत नाही. युती करायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करायची हेच त्यांचं धोरण राहिलं आहे, असं सांगतानाच मैत्रीचं पावित्र्य न जपणाऱ्या शिवसेनेला भाजपला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असा खरमरीत सवाल भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 9:21 pm
कणकवली: शिवसेनेने भाजपसोबत मैत्रीसाठी नव्हे तर फायद्यासाठी युती केली आहे. शिवसेना केवळ मैत्रीच्या गप्पा मारते. मात्र मैत्रीचं पावित्र्य जपत नाही. युती करायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करायची हेच त्यांचं धोरण राहिलं आहे, असं सांगतानाच मैत्रीचं पावित्र्य न जपणाऱ्या शिवसेनेला भाजपला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असा खरमरीत सवाल भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narayan-rane2


मतमोजणीच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेवर सडकून टीका केली. मी जिथं जातो त्या पक्षाचं नुकसान होतं, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांची ही टीका कोकणी माणसाला अजिबात आवडलेली नाही. उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे केवळ जळफळाट आहे, असं सांगतानाच मी शिवसेनेतही काम केलं आणि काँग्रेसमध्येही. मी कुठंही अॅडजस्ट होतोच. पण मी पक्ष सोडताच त्या पक्षाचं नुकसान होतं, असा दावाही राणेंनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला पाळला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवण्यासाठी काहीही योगदान दिलेलं नाही. शिवसेना वाढीसाठी मी आणि सामान्य शिवसैनिकांनी सर्व काही केलं आहे. घाम गाळला आहे. उद्धव हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. कुणीही माझ्यावर टीका करावी आणि मी शांत बसावं असा माझा स्वभाव नाही. माझ्या मनात भरपूर काही आहे. मात्र वेळ आल्यावरच मी बोलेन, असा इशारा त्यांनी दिला. उद्या भाजपचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयी मेळाव्यात मी निश्चितच सहभागी होईल. मी भाजपचा सदस्य आहे. त्यामुळे मला कोणी अडवू शकत नाही. काही लोकांना ते आवडणार नाही. कुणाला आवडो न आवडो मी आमच्या पक्षाच्या विजयी मेळाव्यात जाईलच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राणेंचा मनसेला टोला

सत्ता नाही मिळाल्यावर किंवा निवडणुकीत पराभूत झाल्यावर तुम्ही आपोआप विरोधी पक्ष होता. त्यासाठी मला विरोधी पक्ष नेता करा असं सांगण्याची गरज नसते, असा टोला राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला. राजकीय पक्ष मतदारांकडे जाऊन सत्ता मागत असल्याचं मी आजवर पाहिलं. आम्हाला विरोधी पक्षात बसवा असं म्हणताना कधी ऐकलं नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत हे पहिल्यांदाच पाह्यला मिळालं. खरं तर तुम्ही पराभूत झाल्यावर विरोधी पक्षात आपोआप जाता. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज पडत नाही, असा चिमटाही राणेंनी काढला.

मायावी राक्षसाला भाजपने जवळ केलेय: उद्धव

वांद्र्यात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार; राणेंचे संकेत

राणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज