अ‍ॅपशहर

'राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही'

ग्रामपंचायत निवडणुकांचे अंतिम निकाल येण्यास सुरुवात झाली असतानाच राज्यात आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2021, 2:53 pm
कणकवलीः सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणेंना सत्ता राखण्यात यश आलं असून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर भाजपनं विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitesh-rane


कणकवली तालुक्यातील भिरवंडे ग्रामपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे गेली आहे. हा राणे कुटुंबाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. त्यानंतर नितेश राणेंनी मात्र ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपनं जिंकल्या आहेत. असा दावा केला आहे. तसंच, राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेची सत्ता; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती फेल

कणकवलीतील भिरवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. या निकालावरही नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'भिरवंडेमध्ये आम्हाला ३६ - ३० मतं मिळायची तिथं आज आम्ही दोनशे- तीनशे मतांवर पोहोचलो आहोत. त्यामुळं भिरवंडेमध्ये हा एकप्रकारे शिवसेनेचा नैतिक पराभवच आहे, 'असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तसंच, 'तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीवर २५ वर्षांनी भाजपची सत्ता आली आहे,' असंही ते म्हणाले.

'सिंधुदुर्गात एकहाती सत्ता भाजपनं मिळवली आहे. सावंतवाडीत अजूनही निकालाची काउंटिग सुरु आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृषी कायद्याचा विजय आहे. कोकणातील कृषी कायदे स्वीकारले आहेत. गावाचा विकास भाजपच करु शकते असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळंचं हा विजय मिळाला आहे,' असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.


परळीत भाजपला धक्का; धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय

दरम्यान, भाजपनं देवगडमध्ये २३ पैकी १८, वैभववाडी १२ पैकी ९, कणकवली ३ पैकी १, मालवणमध्ये ६ पैकी ५ तर, कुडाळमध्ये ८ पैकी ४ जागांवर सत्ता मिळवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज