अ‍ॅपशहर

सासुरवाडीला गेलेला वृद्ध पाच दिवसांपासून बेपत्ता, मग गडनदी धरणात मृतदेह आढळल्याने खळबळ

Ratnagri News: रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील येथील गडनदी धरणात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ते सासुरवाडीला गेले असताना ही घटना घडली. पाच दिवसांपासून हा वृद्ध बेपत्ता होता त्यानंतर त्यांचा मृतदेह गडनदी धरणात आढळून आला.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 7:57 pm
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील राजिवली बौद्धवाडी येथील यशवंत धोंडीराम कदम यांचा गडनदी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ते ८४ वर्षांचे होते. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ते सासुरवाडीला गेले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम old man died


कदम हे ९ जानेवारी रोजी सासुरवाडी तिवरे येथे घेरा प्रचितगड येथे गेले होते. १९ जानेवारी रोजी तेथून परत घरी राजिवली येथे येण्यासाठी कुणालाही न सांगता निघाले. मात्र, ते घरी न परतल्याने पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाही. २० जानेवारीला नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात दिली होती.

हेही वाचा-पतीच्या मृत्यूला ९ वर्ष झाली, मग अचानक सोशल मीडियावर एका व्हिडीओत तिला असं काही दिसलं की...

२३ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह गडनदी धरणामध्ये आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. संगमेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे घटनास्थळी जावून पंचनामा केला. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

हेही वाचा-नर्तिका पुरविण्याच्या बहाण्याने भलताच प्रकार, नगर जिल्ह्यात हे चाललंय काय?

८४ वर्षांचे असलेले वृद्ध यशवंत कदम हे काम धंदा करुन संगमेश्वर तालुक्यात दाभोळे येथे राहत असत. त्यांची दोन मुले आणि पत्नी मुंबई येथे होती. सुरुवातीला हा मृतदेह आढळल्यावर तो कोणाचा आहे हे लक्षात येत नव्हतं. मात्र, नंतर पोलिसांना हा मृतदेह कोणाचा आहे हे निष्पन्न झालं. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे

हेही वाचा-शाळेतून घरी जात होत्या, स्पीडब्रेकरवर दुचाकी आदळली अन् रस्त्यावर पडल्या, शिक्षिकेचा करुण अंत

महत्वाचे लेख