अ‍ॅपशहर

​ महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा चोरीला

किल्ले रायगडावर बसवण्यात आलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे.

Maharashtra Times 11 Dec 2016, 1:31 am
रायगडावरील प्रकाराने खळबळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raigad fort news
​ महाराजांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा चोरीला


म. टा. प्रतिनिधी, उरण

किल्ले रायगडावर बसवण्यात आलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तलवारीचा तुकडा चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे.

सन २००७मध्ये किल्ले रायगडावरील राजदरबारातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पुतळा बसवण्यात आला होता. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती आणि संभाजी ब्रिगेड यांनी छत्रपतींच्या या पंचधातूच्या पुतळ्याची स्थापना केली होती. शनिवारी सकाळी या पुतळ्याच्या सुमारे ४० इंच लांबीच्या तलवारीपैकी सात ते आठ इंच लांबीचा भाग चोरीला गेला असल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली. पुरातत्त्व विभागाने तातडीने या घटनेची माहिती महाड येथील पोलिस ठाण्याला दिली. या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सकाळी पाच ते नऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज असून, तलवारीचा हा तुकडा नैसर्गिकरीत्या तुटल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुरातत्त्व खात्याचे संदीप विठ्ठल ओकेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत तपास सुरू असून कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘ही तलवार पाच ते सव्वापाच फूट लांब असून, पूर्णपणे तांब्याची घडवलेली आहे. पुरेसा धातू वापरल्याने ती सहजगत्या तुटणे किंवा निखळणे शक्य नाही. जास्त बळाचा वापर केला गेल्यानेच तलवार तुटली आहे,’ असे शिल्पकार सतीश घारगे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज