मटा ऑनलाइन वृत्त । रत्नागिरी
एसटी बसच्या मागे लागलेले अपघातांचs दुष्टचक्र संपलेलं नसून आज राजापूरजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध महिला ठार, तर १५ ते २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ असलेल्या हातिवले गावात आज सकाळीच हा अपघात घडला. हातिवले कॉलेजला जाणारी एसटी आणि जुवाटी-राजापूर एसटी बसमध्ये जोरदार धडक झाली. चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांनी त्याबाबत तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. दोन्ही गाड्या हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
एसटी बसच्या मागे लागलेले अपघातांचs दुष्टचक्र संपलेलं नसून आज राजापूरजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध महिला ठार, तर १५ ते २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ असलेल्या हातिवले गावात आज सकाळीच हा अपघात घडला. हातिवले कॉलेजला जाणारी एसटी आणि जुवाटी-राजापूर एसटी बसमध्ये जोरदार धडक झाली. चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांनी त्याबाबत तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. दोन्ही गाड्या हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.