अ‍ॅपशहर

संशयितरित्या कार उभी दिसली, हटकताच सुरू झाला थरारक पाठलाग, नंतर जे घडले ते...

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाईत करत तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पकडणाऱ्या पोलिसांचा पोलीस अधीक्षकांनी गौरव केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2022, 10:40 am
रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळ हातखंबा येथे लाखो रुपयांची काजू बी चोरी होण्याचा प्रकार तब्बल दोनवेळा घडला होता. त्यामुळे रत्नागिरी पोलीसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री २९ जूनला रत्नागिरी ग्रामीण पोलीस गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratnagiri gramin police arrest three accused
संशयितरित्या कार उभी दिसली, हटकताच सुरू झाला थरारक पाठलाग नंतर जे घडले ते...


संशयितरित्या ह्युंदाई कार गोळप परिसरात उभी होती. पण पोलीसजवळ येताच ही कार चालकाने सुसाट नेली. यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग. कार पावसाच्या दिशेने सुसाट गेली. गस्ती पथकाने प्रसंगावधान ठेवत तात्काळ पूर्णगड पोलिसांना याची माहिती दिली. पावस येथे ही कार थांबवून चौकशी करून तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले.

सांगली, कोल्हापूर, गोवा येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या

१) रज्जाक असलम मुजावर, वय २३, रा. नांग्रे सांगली बायपास पलूस रोड, इनाम पट्टी ता. मिरज जि. सांगली २) साहिल इसाक सायनावाले, वय २२, रा. करासवाडा म्हापसा, बार्देश नॉर्थ गोवा, ३) अक्षय संतोष पाटील, चय २४, रा. देवकांडगाव ता. आजरा जि. कोल्हापूर यांना तात्काळ ताब्यात घेवून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार क्र.एम.एच.०९/ एफएल / ४१७६ गुन्ह्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण ८,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग

रत्नागिरी, चिपळूण खेर्डी येथील चोऱ्यांची दिली कबुली

यातील रोख रक्कम रुपये २१,०००/- बाबत चौकशी करण्यात आली. ही रक्कम त्यांनी श्री गजानन महाराज मंदीर गोळप सडा येथील मंदीरातील दानपेटी फोडून चोरल्याचे सांगितले. पान टपरीतील साहित्याबाबत त्यांनी ते चिपळुण खेर्डी येथील एमआयडीसीकडे जाणारे रोड लगतची टपरी फोडून चोरुन आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता मागील सुमारे तीन महिन्यांपूर्वी निवळी येथील दळवी कॅशू येथील चोरी करून सुमारे २,२०,०००/- रुपये किंमतीच्या काजू बिया चोरून नेल्याचीही कबुली दिली आहे.

डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्याकडून गस्ती पथकाचा गौरव

पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, उपविभागिय पोलीस अधिकारी वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली ही मोठी तपास मोहिम फत्ते झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य, जाधव पूर्णगड पोलीस ठाणे, दत्ता शेळके, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी इंदुलकर, सतीश साळवी (चालक), हवालदार उदय वाजे, पोलीस नाईक वैभव मोरे तसेच पूर्णगड पोलीस ठाणेचे हवालदार ललीत देनुसकर, योगेश भातडे (चालक) यांनी ही मोठी कामगीरी बजावली आहे. या सगळ्या पोलीस टीमने सतर्कता बाळगून ही कामगिरी बजावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याहस्ते त्यांचा गुरूवारी ३० जूनला गौरव करण्यात आला.

कोकणासाठी पावसाबाबत महत्त्वाची बातमी, हवामान खात्याने दिला मोठा इशारा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज