रत्नागिरी, तिवरे (चिपळूण) : सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर झालेली बेसुमार वृक्षतोड, अवैध बांधकामे आणि मातीचे उत्खनन यामुळे सह्याद्री खचू लागला आहे. सह्याद्रीने ही धोक्याची घंटा २२ जुलैला चिपळूण परिसरात झालेल्या महापुराच्या रुपाने दिली आहे. यातून आपण धडा घेतला नाही, तर भविष्यात पूर्ण चिपळूण शहर वाचवणे अवघड होईल, अशी भीती सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये २२ जुलैच्या पहाटे आलेला महापूर हा धरणातून पाण्याचा विसर्ग केला म्हणून आला इथपासून विविध कारणांचे अनेक मेसेजेस प्रसारित होत होते. मात्र, हा महापूर धरणाच्या पाण्यामुळे नव्हे, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दसपटी भागात झालेल्या ढगफुटीने आल्याचे समोर आले आहे. या भागात सर्वात प्रथम ‘मटा’चे प्रतिनिधी पोहचले आणि ठिकठिकाणी दरड कोसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ढगफुटीमुळे डोंगरावरील झाडे उन्मळून खाली आली आणि जमीन खचल्याने पाण्यासोबत लालमातीही प्रवाहित झाली आणि ती शहरात येऊन आता ते लाल चिखल पाहावयास मिळत आहे. निसर्गाचे हे रौद्ररुप प्रथमच पाहिल्याचे तिवरे गावातील ८२ वर्षीय माजी सैनिकाने सांगितले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे हे असे रुप आम्ही पहिल्यांदाच अनुभवतोय, असे अनुभव भीतीच्या छायेत असलेल्या इथल्या गावकऱ्याच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत.
पूर येऊन आठ दिवस झाले, तरी आजही दहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. दसपटी भागात दहा गावांना जोडणारा कळकवणे-दादर पूल आणि बाजूच्या गावातील एक असे दोन पूल तुटले आहेत. यामुळे पुढील तिवरे, रिटकोळी, तिवडी, इंदापूर, आकल, कादवड, नांदविसे, ओहळी, तिवडी या गावांतील सुमारे १० हजार नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही अवघड झाले आहे. कणकवणे-दादर या गावातील नदीकिनारी असलेली दोन घरे वाहून गेली आहेत. पूल जोडणी नसल्याने रुग्णसेवेपासून अत्यावश्यक सेवेच्या अनेक समस्या येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी या गावातील एका महिलेला प्रसूतीसाठी नदीपात्रातून चालत समोरच्या बाजूला आणून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले.
एवढी बिकट परिस्थिती असली तरी प्रशासन या भागात पुरेसे लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. आठ दिवसांनंतरही या भागात प्रशासनाचा एकही माणूस फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा पूल पूर्ववत होत नाही, तोपर्यंत येथील लोकांना कामावर जाणेही अवघड झाल्याचे ते सांगतात. प्रशासनाने या भागात तातडीने उपाययोजना करुन किमान एक पूल तरी सुरु करावा आणि जनजीवन सुरळीत करावे, अशी मागणी कळवणे-दादर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता आंबेड यांनी केली आहे. तसेच डोंगर खचण्याच्या या प्रकाराकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन उपायायोजना कराव्यात, असेही त्या म्हणाल्या.
या महापुराच्या माध्यमातून पश्चिम घाटातील भूस्खलनाचीबाब समोर आली आहे. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करून हा परिसर अधिक जैव-सुरक्षित कसा करता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. याचबरोबर दरडींचा धोका असलेल्या या भागांतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करणार आहोत.
पूर येऊन आठ दिवस झाले, तरी आजही दहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. दसपटी भागात दहा गावांना जोडणारा कळकवणे-दादर पूल आणि बाजूच्या गावातील एक असे दोन पूल तुटले आहेत. यामुळे पुढील तिवरे, रिटकोळी, तिवडी, इंदापूर, आकल, कादवड, नांदविसे, ओहळी, तिवडी या गावांतील सुमारे १० हजार नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही अवघड झाले आहे. कणकवणे-दादर या गावातील नदीकिनारी असलेली दोन घरे वाहून गेली आहेत. पूल जोडणी नसल्याने रुग्णसेवेपासून अत्यावश्यक सेवेच्या अनेक समस्या येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन दिवसांपूर्वी या गावातील एका महिलेला प्रसूतीसाठी नदीपात्रातून चालत समोरच्या बाजूला आणून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले.
एवढी बिकट परिस्थिती असली तरी प्रशासन या भागात पुरेसे लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. आठ दिवसांनंतरही या भागात प्रशासनाचा एकही माणूस फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा पूल पूर्ववत होत नाही, तोपर्यंत येथील लोकांना कामावर जाणेही अवघड झाल्याचे ते सांगतात. प्रशासनाने या भागात तातडीने उपाययोजना करुन किमान एक पूल तरी सुरु करावा आणि जनजीवन सुरळीत करावे, अशी मागणी कळवणे-दादर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता आंबेड यांनी केली आहे. तसेच डोंगर खचण्याच्या या प्रकाराकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन उपायायोजना कराव्यात, असेही त्या म्हणाल्या.
या महापुराच्या माध्यमातून पश्चिम घाटातील भूस्खलनाचीबाब समोर आली आहे. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करून हा परिसर अधिक जैव-सुरक्षित कसा करता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. याचबरोबर दरडींचा धोका असलेल्या या भागांतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करणार आहोत.