अ‍ॅपशहर

अखेर राणे आणि उद्धव यांचे 'या'वर एकमत

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने तब्बल एका तपानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते व पूर्वाश्रमीचे नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले. याचवेळी त्यांचे अखेर एका बाबतीत एकमत झाल्याचे चित्र समोर आले. त्याच वेळी राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Times 23 Jun 2017, 10:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कुडाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena chief uddhav thakarey and congress leader narayan rane share dias
अखेर राणे आणि उद्धव यांचे 'या'वर एकमत


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने तब्बल एका तपानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते व पूर्वाश्रमीचे नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांचे अखेर एका बाबतीत एकमत झाल्याचे चित्र समोर आले. त्याच वेळी राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच मंचावर असल्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नारायण राणे यांनी उद्धव यांचे सपत्नीक स्वागत करून सगळ्यांना धक्का दिला. त्यानंतर नारायण राणे यांनी विकासाच्या आड राजकारण येता कामा नये अशी भूमिका मांडली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात चांगले काम करत असल्याचे सांगत कौतुकही केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विकास पुरूष असल्याचेही प्रशंसोद्गार राणे यांनी काढले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे यांचा माझे पूर्वीचे सहकारी असा उल्लेख केला. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये, राजकारण राजकारणाच्या दिशेला असावं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या भूमिकेला सहमती दर्शवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगवान काम करणारे मंत्री असल्याचे उद्धव यांनी म्हंटले. कोकणचा विकास करताना स्थानिकांना उद्योगाचे प्रशिक्षण दिले पाहिजे अन्यथा उपरेच या विकासाचा फायदा घेतील असेही उद्धव यांनी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान खास शैलीत 'आता गोव्याला होणार जाणे ....कारण एकत्र आले उद्धव आणि राणे' अशी कविता सादर करत दोन्ही नेत्यांच्या १२ वर्षानंतरच्या भेटीवर भाष्य केले.

दरम्यान, नारायण राणे यांनी कार्यक्रमानिमित्त केलेल्या बॅनरबाजीमधून काँग्रेसचा उल्लेखदेखील नव्हता मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज