अ‍ॅपशहर

Weather Updates : मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार; ३ दिवसांसाठी यलो अलर्ट

Mumbai Rain Alert : हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2022, 5:14 pm
रत्नागिरी : कोकणात गेले काही दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भात पिकांची कापणी सुरू असतानाच आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी दैना उडाल्याचं चित्र आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाणे आणि पालघरसाठीही दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain alert in mumbai
पावसाचा इशारा (प्रातिनिधिक फोटो)


हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अजूनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर यादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ३०-४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधनता व सुरक्षितता बाळगावी असे, आवाहन कोकणात या तीनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

आम्ही फक्त नाश्ताच करायचा काय? शिंदे गटातील आमदार नाराज

दरम्यान, कोकणात अनेक ठिकाणी हळव्या जातीच्या भाताची कापणी गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. महान भात (उशिरा तयार होणारे) हेही भात पीक काही दिवसांत कापणीला येईल. अनेक शेतकऱ्यांनी हळवे भात कापून शेतात वाळण्यासाठी ठेवला होता, मात्र अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

दरम्यान, ऑक्टोबर सुरू झाल्यावरही काही केल्या पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने कोकणातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज