सांगली : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या गणपतीची प्रतिष्ठापना आज साध्या पद्धतीने करण्यात आली. कोणताही शाही लवाजमा न घेता श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्याहस्ते श्रींची पूजा करून उत्सवाला सुरुवात झाली. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणपती पंचायतन संस्थानच्या वतीने दरवर्षी पाच दिवस उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत शाही वातावरणात विविध कार्यक्रम पार पडतात. मात्र करोना आणि महापूर यामुळे यंदा सांगली संस्थानचा गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. कोणताही शाही डामडौल न करता गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि संपूर्ण पटवर्धन परिवाराकडून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि कर्मचारी उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी चार दिवस आधीच सांगलीत चोर गणपतीचे आगमन होत असते. चार दिवसांपूर्वी त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा करोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना राजवाड्यातील गणपतीचे दर्शन घेता येणार नाही. तर पाच दिवस साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा केला जाईल आणि सांगलीकर जनतेनेही करोना नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करावा, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.
यावेळी संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि संपूर्ण पटवर्धन परिवाराकडून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि कर्मचारी उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी चार दिवस आधीच सांगलीत चोर गणपतीचे आगमन होत असते. चार दिवसांपूर्वी त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा करोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना राजवाड्यातील गणपतीचे दर्शन घेता येणार नाही. तर पाच दिवस साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा केला जाईल आणि सांगलीकर जनतेनेही करोना नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करावा, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.