अ‍ॅपशहर

आजवर जे पाकिस्तानात व्हायचे ते महाराष्ट्रात झाले; पाहा तरुणाने रस्त्यावर येऊन काय केले

१९९२ पासून वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकू शकले नाही. एक दिवशीय वर्ल्डकपमध्ये सात वेळा, तर टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भारताने पाकिस्तानला धुळे चालली होती. त्यामुळे रविवारच्या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या प्रबळ दावेदार मानला जात होता. पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच.

Maharashtra Times 25 Oct 2021, 11:56 am
सांगली : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान (ind vs pak t20 ) संघाने भारतीय संघाचा दारुण पराभव केल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये पाटील गल्लीत तरुणांनी टीव्ही फोडून आपला राग व्यक्त केला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेनं क्रिकेट शौकिनांच्या संतप्त भावना समोर आले आहेत. सराव सामन्यांमध्ये मोठ्या संघांना धूळ चालणारा भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात एकतर्फी हार कशी पत्करतो? असा सवालही क्रिकेट शौकीनांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ina-pak
आजवर जे पाकिस्तानात व्हायचे ते महाराष्ट्रात झाले; पाहा तरुणाने रस्त्यावर येऊन काय केले


टी -२० स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तान विरुद्ध रविवारी सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने भारतीय संघाचा एकतर्फी पराभव करून यापूर्वी वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवांचे उट्टे काढले. यापूर्वीच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला १३ वेळा पराभूत केले होते. तर पाकिस्तानी संघाला एकही विजय मिळाला नव्हता. १९९२ पासून वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकू शकले नाही. एक दिवशीय वर्ल्डकपमध्ये सात वेळा, तर टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भारताने पाकिस्तानला धुळे चालली होती. त्यामुळे रविवारच्या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या प्रबळ दावेदार मानला जात होता. प्रत्यक्षात मात्र भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. तर गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे दहा विकेटने पराभव पत्करावा लागला.


प्रेमभंग झाल्याने तरुणीचा चिरला गळा, ब्रेकअपनंतर नात्यात दुरावा आला अन्....
भारतीय संघाने दीडशे धावांचा टप्पा गाठल्यानंतर चुरशीची मॅच होईल, अशी क्रिकेटरसिकांना अपेक्षा होती. पण गोलंदाजांच्या चुकांमुळे भारताला एकही विकेट मिळवता आली नाही. कोणतातरी गोलंदाज चमत्कार घडवेल आणि पाकिस्तानी संघाचा विकेट पडतील. या भावनेने लाखो क्रिकेट रसिक रात्री उशिरापर्यंत टीव्हीसमोर बसले होते. मात्र, भारताचा पराभव झाल्यानंतर त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. इस्लामपूरमध्ये पाटील गल्लीतील तरुणांनी घरातील टीव्ही रस्त्यावर आणून फोडला. टीव्हीवर दगड घालून त्यांनी आपला राग व्यक्त केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातून क्रिकेट रसिकांच्या भावना समोर आल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज