म. टा. प्रतिनिधी, सांगली : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी ( koregaon bhima violence ) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची ( sambhaji bhide ) सबळ पुराव्याअभावी गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. मात्र, या दंगलीतील मुख्य सूत्रधार, एल्गार परिषदेचे आयोजक आणि कबीर कलामंच यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkar ) यांनी प्रक्षोभक भाषण आणि वक्तव्य करून राज्यभर जातीय तेढ निर्माण केली. त्यामुळे त्यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केली आहे. मुख्य सूत्रधार असणाऱ्या, कट कारस्थान करणाऱ्या शहरी नक्षलवादाविरोधात राज्यभर मोर्चे काढणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली प्रकरणी पुराव्यांअभावी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मुक्तता झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने कारवाईची मागणी केली आहे.
भिडे गुरुजींचे नाव वगळले हा प्राथमिक विजय आहे. १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या या दंगलीत संभाजी भिडे यांना सर्वप्रथम उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला होता. कोरेगाव भीमाच्या आडून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. या दंगलीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांनी समस्त हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम केलं. माध्यमांसमोर वक्तव्य करून जाती-जातीत तेढ निर्माण केली. त्यानंतर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत दोघांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर समाजामध्ये जातीय विष पेरण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पुणे ग्रामीण पोलिसांनी यात तथ्य नसल्याचा तपास केला आहे. त्यामुळे या दंगलीच्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करावी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी नितीन चौगुले यांनी केली. या कारवाईच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश खांबे, आनंदराव चव्हाण, भूषण गुरव, प्रकाश निकम, अजिंक्य बोलाज, युवराज जाधव उपस्थित होते.
'राज ठाकरेंना अटक करून दाखवाच', सदाभाऊ खोतांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली प्रकरणी पुराव्यांअभावी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मुक्तता झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने कारवाईची मागणी केली आहे.
भिडे गुरुजींचे नाव वगळले हा प्राथमिक विजय आहे. १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या या दंगलीत संभाजी भिडे यांना सर्वप्रथम उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला होता. कोरेगाव भीमाच्या आडून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. या दंगलीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांनी समस्त हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम केलं. माध्यमांसमोर वक्तव्य करून जाती-जातीत तेढ निर्माण केली. त्यानंतर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत दोघांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानंतर समाजामध्ये जातीय विष पेरण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पुणे ग्रामीण पोलिसांनी यात तथ्य नसल्याचा तपास केला आहे. त्यामुळे या दंगलीच्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करावी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी नितीन चौगुले यांनी केली. या कारवाईच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश खांबे, आनंदराव चव्हाण, भूषण गुरव, प्रकाश निकम, अजिंक्य बोलाज, युवराज जाधव उपस्थित होते.
'राज ठाकरेंना अटक करून दाखवाच', सदाभाऊ खोतांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान