अ‍ॅपशहर

सांगलीच्या कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नव्हे तर खून, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गेली ७ ते ८ दिवस पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर ३०२ कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2022, 6:33 pm
सांगली : म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बरोबर आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने सांगलीसह संपूर्ण राज्य हादरलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Sangli Miraj mhaisal family is not suicide its Murder sangali Sp pravin gedam
म्हैसाळ खून प्रकरण


सांगलीचे पोलीस अधिक्षक प्रवीण गेडाम काय म्हणाले?

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. गेली ७ ते ८ दिवस पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येचं ३०२ कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत. २ आरोपींनी विषारी औषध दिलं. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होईल, अजूनही चौकशी सुरू आहे, अशी माहिती सांगली पोलीस अधिक्षक प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

सांगली प्रकरण: सावकाराच्या जाचाला कंटाळूनच 'त्या' ९ जणांची आत्महत्या, १३ सावकारांना अटक
प्रकरण काय?

म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. या घटनेने संपूर्ण राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी अटकळ बांधली गेली. घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांकडून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने झाली, हा घातपात आहे, की नेमकी आत्महत्या की आणखी काय आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं.

पण आता म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज