अ‍ॅपशहर

कॉंग्रेसनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला, हवी तर यादी देतो; जयंत पाटील यांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला या कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2022, 9:26 pm
सांगली: जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाशी (BJP) हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसच्या (Congress) पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत जयंत पाटील यांनी काँग्रेसवर केला आहे. तसेच या बाबत दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर या सर्व गोष्टी घालण्यात आले आहेत, मात्र यात कोणताही बदल स्थानिक पातळीवर झाला नाही. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (ncp leader jayant patil gives reply to congress)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp leader jayant patil gives reply to congress on its criticism on ncp
कॉंग्रेसनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला, हवी तर यादी देतो; जयंत पाटील यांचा पलटवार


मिरज या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवी प्रदाना सोहळा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला,त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडत काँग्रेसवर एक प्रकारे पलटवार केला.

क्लिक करा आणि वाचा- 'आघाडी सरकार पाडण्यासाठी दंगली घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय'

राज ठाकरेंना लोक फारसे गांभीर्याने घेत नाहीत

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकांवही भाष्य केले. राज ठाकरे यांनी भूमिका बदलतात,काही कालांतराने त्याला वेगवेगळ्या बाह्य कारणे असतात, पण ते भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे जे करतात ते लोक फारसे गांभीर्याने घेत नाही, त्यांच्या सभांना गर्दी होते, कारण ते चांगल्या पद्धतीचे नकला करतात, ते बघायला गर्दी होते. पण लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत, त्यामुळे राज ठाकरेंनी देखील आता आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्ला देखील जयंत पाटील राज ठाकरेंना दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- उप वनसंरक्षक अधिकाऱ्याकडून धक्कादायक कृत्य; सांगलीत खळबळ

क्लिक करा आणि वाचा- एसटी कर्मचाऱ्याचा अंगावर डिझेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न, मिरज डेपोतील प्रकार

महत्वाचे लेख