सांगली : आज पहाटे सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज, सोमवारी (दि.१५) पहाटे २ वाजून ३६ मिनिटांनी चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. वारणा पाटबंधारे विभाग वारणाचे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी याबाबत माहिती दिली.
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती पासून १८.४ किलोमीटर अंतरावर असल्याचे येथील भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले. वीस दिवसांपूर्वी चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता २.९ रिश्टर इतकी होती. त्यानंतर पुन्हा भूकंपाचा हा धक्का वारणावती व चांदोली वारणा धरण परिसरात जाणवला आहे.
या भूकंपाच्या धक्क्याचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जीवितहानी झाली नाही. सांगली जिल्ह्याबरोबरच रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के बसले. रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे, पाली, साखरपा, संगमेश्वर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज २० दिवसानंतर पुन्हा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचा धक्का चांदोली परिसराला बसला आहे.
वारंवार बसणाऱ्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती पासून १८.४ किलोमीटर अंतरावर असल्याचे येथील भूकंपमापन केंद्राकडून सांगण्यात आले. वीस दिवसांपूर्वी चांदोली परिसराला भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता २.९ रिश्टर इतकी होती. त्यानंतर पुन्हा भूकंपाचा हा धक्का वारणावती व चांदोली वारणा धरण परिसरात जाणवला आहे.
या भूकंपाच्या धक्क्याचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जीवितहानी झाली नाही. सांगली जिल्ह्याबरोबरच रत्नागिरीतही भूकंपाचे धक्के बसले. रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे, पाली, साखरपा, संगमेश्वर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज २० दिवसानंतर पुन्हा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचा धक्का चांदोली परिसराला बसला आहे.
वारंवार बसणाऱ्या या धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाने दिला आहे.