अ‍ॅपशहर

तिघे जीवलग मित्र, मुंबईला परतताना कारला अपघात, दोघांच्या मृत्यूने आभिसेवाडीवर शोककळा

Sangli Jat Yelavi Village Car Accident : एका कार अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या मित्र जखमी झाला आहे. तिघेही जीवलग मित्र होते. पण दोन मित्रांनी अपघातात जीव गमवला आहे. तिघेही मित्र एकाच गावातील होते. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2023, 10:18 am
सांगली : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून दोन जण जागीच ठार झाले. जत तालुक्यातल्या येळावी या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. तर या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दगडू शंकर करंडे (वय ३५) आणि सुखदेव खरात (वय ३६) अशी मृतांची नावे आहेत. तर बापू धोंडीबा शिंदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sangli Accident News
तिघे जीवलग मित्र, मुंबईला परतताना कारला अपघात, दोघांच्या मृत्यूने आभिसेवाडीवर शोककळा


हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या आभिसेवाडी येथील आहेत. तिघेही जीवलग मित्र होते. मुंबईमध्ये कंटेनर चालक म्हणून कार्यरत होते. मृत दगडू करंडे यांची पत्नी जत येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. पत्नीला पाहण्यासाठी आपल्या मित्रांच्या सोबत ते कारने जत येथे आले होते. यानंतर मुंबईला परतत असताना येळावी येथील घोलेश्वर फाट्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर वनीकरणच्या हद्दीजवळ पोहोचले असता कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. आणि कार रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

इंजिनिअर लेक सुट्टीसाठी गावी, वडिलांबरोबर बाईकवर निघाली पण रस्त्यातच काळाने गाठलं...
मृत दगडू शंकर करंडे व सुखदेव खरात आणि जखमी बापू धोंडीबा हे तिघेही एकाच गावचे आणि तिघेही मुंबईत कंटेनर चालक म्हणून काम करत होते. तिघेही सुट्ट्या घेऊन आपल्या गावी आले होते. मृत दगडू करंडे यांच्या पत्नीवर जत येथील एका खासगी रुग्णालयामध्ये पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि या ठिकाणी त्या उपचार घेत होत्या.

पत्नीला बघण्यासाठी गावी जात असल्याने दगडू करंडे यांनी आपल्या जीवलग मित्रांना देखील सोबत घेतले. आणि तिघेही शुक्रवारी सकाळी कारने जत येथे आले होते. दगडू करंडे यांनी आपल्या पत्नीची भेट घेतली. रुग्णालयामधून भेट झाल्यानंतर दगडू करंडे हे आपल्या मित्रांसोबत पुन्हा परत निघाले. मात्र तीन मित्रांपैकी दोन मित्र भीषण अपघातात ठार झाले आहेत. अपघाताच्या घटनेमुळे अभिसेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

महत्वाचे लेख