अ‍ॅपशहर

दोनच मंत्री, त्याला सरकार कसं म्हणायचं? विश्वजित कदम यांनी उडवली खिल्ली

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यात मंत्रिच नाही, हे कसले सरकार, अशी टीका त्यांनी केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2022, 10:13 pm
सांगली: दोनच मंत्री आहेत, त्याला सरकार कसं म्हणायचं,अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री व काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना मदतीची गरज आहे.पण सरकारच अस्तित्वात नाही,अशी टीकाही आमदार कदम यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vishwajeet kadam slams shinde fadnavis government
दोनच मंत्री, त्याला सरकार कसं म्हणायचं? विश्वजित कदम यांनी उडवली खिल्ली


राज्यात सध्या अनेक भागात पूरस्थिती आहे.शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळही तयार झालेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, असे दोनच मंत्री राज्यात आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणार तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. केंद्र व राज्यातील भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरूच आहे.आता स्थानिक पातळीवरही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. मिरजेतील ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाबाबत नोटिसा बजावल्या आहेत, त्या चुकीच्या असून याविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढू. राज्यातही अशाप्रकारे विरोधी पक्षाच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेस अशा दबावाला बळी पडणार नाही. एकसंधपणे येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही ताकदीने लढवू, असा विश्वासही आमदार कदम यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज