अपशिंगेत आज बंद
सातारा
सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गाव हल्ल्याचे वृत्त येताच सुन्न झाले होते. सीआरपीएफमध्ये गावातील सुमारे ४० जवान कार्यरत आहेत. सैनिकांच्या कुटुंबीयातही अस्वस्थता होती. सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी संपर्क साधण्यासाठी गावातील लोकांची फोनाफोनी सुरू होती. या घटनेचा कोणताही राजकीय मुद्दा न करता अतिरेक्यांचा कायमचा बीमोड होण्याची गरज आहे, असे मत ही गावकऱ्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज, शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे.