सातारा : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी सातारा शासकीय विश्रामगृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्याविरोधात तक्रार देणारे दिगंबर आगवणे यांना शिखंडी बनवून विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे गलिच्छ राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप अनुप शहा यांनी पत्रकार परिषदेत केला.
बारामतीमध्ये एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटणचा विकास झाला नसल्याचे म्हटले होते. रामराजे नाईक निंबाळकर हे कर्तृत्व शून्य आहेत, हे यावरूनच स्पष्ट होते. माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर हे कर्तृत्ववान असून त्यांच्यामुळेच फलटणमधील कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अनेक चांगली कामं माढा मतदारसंघात केली आहेत. यामुळेच त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचंही अनुप शहा म्हणाले.
खासदारांकडे कर्तृत्व आहे म्हणून त्यांनी अनेक वर्षे रेंगाळलेला रेल्वेचा प्रश्न सोडवला. फलटण तालुक्याचं गेलेलं पाणी त्यांनी बारामतीकरांच्या नरड्यात हात घालून आणलं. याला कर्तृत्व म्हणतात. खोट्या केसेसमध्ये विरोधकांना अडकवणं याला कर्तृत्व म्हणत नाहीत. हे कोण करतंय हे जिल्ह्याला चांगलं माहिती आहे. खासदार उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोणी खोट्या केसेस दाखल केल्या, माझ्याविरोधातही खोट्या केसेस केल्या. खासदारांविरोधात चालूच आहेत. यामुळे रामराजे यांनी किमान आपल्या आजोबांच्या नावाला काळीमा फासणार नाही याची काळजी घ्यावी, असे शहा बोलले.
मला जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला - शरद पवार
बारामतीमध्ये एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटणचा विकास झाला नसल्याचे म्हटले होते. रामराजे नाईक निंबाळकर हे कर्तृत्व शून्य आहेत, हे यावरूनच स्पष्ट होते. माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर हे कर्तृत्ववान असून त्यांच्यामुळेच फलटणमधील कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अनेक चांगली कामं माढा मतदारसंघात केली आहेत. यामुळेच त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा विरोधकांचा डाव असल्याचंही अनुप शहा म्हणाले.
खासदारांकडे कर्तृत्व आहे म्हणून त्यांनी अनेक वर्षे रेंगाळलेला रेल्वेचा प्रश्न सोडवला. फलटण तालुक्याचं गेलेलं पाणी त्यांनी बारामतीकरांच्या नरड्यात हात घालून आणलं. याला कर्तृत्व म्हणतात. खोट्या केसेसमध्ये विरोधकांना अडकवणं याला कर्तृत्व म्हणत नाहीत. हे कोण करतंय हे जिल्ह्याला चांगलं माहिती आहे. खासदार उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात कोणी खोट्या केसेस दाखल केल्या, माझ्याविरोधातही खोट्या केसेस केल्या. खासदारांविरोधात चालूच आहेत. यामुळे रामराजे यांनी किमान आपल्या आजोबांच्या नावाला काळीमा फासणार नाही याची काळजी घ्यावी, असे शहा बोलले.
मला जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला - शरद पवार