सातारा ः मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमे लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर अचानक महामार्ग रोखण्यावरून हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे आक्रमक बनले, की अचानक विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांसह तब्बल ३२ कर्मचारी जखमी झाले आहेत. दुपारी तीननंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला रोखत धरपकड मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता, गुरुवारी सकाळपर्यंत दहा जणांचा दंगलीत प्रत्यक्ष सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले, शूटींग फोटो याची खातरजमा केली असता, त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली असून यामध्ये सुमारे अडीच हजार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांचे तक्रारीत म्हणणे आहे.
अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा
सातारा ः मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध ...
Maharashtra Times 27 Jul 2018, 4:00 am