सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त (ED attaches Jarandeshwar sugar mill) केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.
काय आहे राज्य सहकारी बँक घोटाळा?
राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने आपला गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर काय म्हणाले अण्णा हजारे?
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'उशिरा का होईना कारवाईला सुरुवात झाली. आता इतर साखर करखान्यावरही अशीच कारवाई होईल, ही अपेक्षा. आम्ही तक्रार केल्याप्रमाणे यातून खूप मोठा गैरव्यवहार बाहेर येणार आहे,' असा दावा यावेळी अण्णा हजारे यांनी केला आहे.
काय आहे राज्य सहकारी बँक घोटाळा?
राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने आपला गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर काय म्हणाले अण्णा हजारे?
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'उशिरा का होईना कारवाईला सुरुवात झाली. आता इतर साखर करखान्यावरही अशीच कारवाई होईल, ही अपेक्षा. आम्ही तक्रार केल्याप्रमाणे यातून खूप मोठा गैरव्यवहार बाहेर येणार आहे,' असा दावा यावेळी अण्णा हजारे यांनी केला आहे.