म. टा. वृत्तसेवा, सातारा
सातारा शहरातून कास पुष्प पठाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. अरुद घाट रस्त्यातील मोठ्या दरीकडील बाजूच्या रस्त्याचा भाग दरड स्वरुपात दरीत कोसळला आहे. चार चाकी वाहन जाण्या इतकाही डांबरी रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
सुमारे ५० मीटरचा हा भाग दरीत ढासळला आहे. स्थानिक नगरसेवक धनंजय जांभळे , मॅरेथॉन संघटनेचे धावपटूंनी येथे तातडीने मोठे दगड लावून रस्ता पोलिसांच्या मदतीने बंद केला. सतत पडणाऱ्या पावसाने आणि येथून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनांच्या दाबामुळे रस्त्यावर मोठा ताण येत आहे. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आज, सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने पठारावर हजारो पर्यंटकांची उपस्थिती रहाणार होती. पहाटे लवकर आलेल्या पर्यटकांना आता अडचण निर्माण झाली आहे. यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक अडकले आहेत. घाट खचल्याने घटनास्थळी प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, पर्यायी मार्गावरून जुन्या राजमार्गाने म्हणजेच (महाबळेश्वर मार्गे) वाहतूक वळविली आहे. यवतेश्वर घाटातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर लवकरात लवकर करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू
यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. कास पठाराकडे जाण्यासाठी लहान वाहनांसाठी एका साईडने या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
दरड कोसळल्यापासून एका तासाच्या आत एका साईडने लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सिंघल यांनी सांगितले.
सातारा शहरातून कास पुष्प पठाराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. अरुद घाट रस्त्यातील मोठ्या दरीकडील बाजूच्या रस्त्याचा भाग दरड स्वरुपात दरीत कोसळला आहे. चार चाकी वाहन जाण्या इतकाही डांबरी रस्ता शिल्लक राहिलेला नाही.
सुमारे ५० मीटरचा हा भाग दरीत ढासळला आहे. स्थानिक नगरसेवक धनंजय जांभळे , मॅरेथॉन संघटनेचे धावपटूंनी येथे तातडीने मोठे दगड लावून रस्ता पोलिसांच्या मदतीने बंद केला. सतत पडणाऱ्या पावसाने आणि येथून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनांच्या दाबामुळे रस्त्यावर मोठा ताण येत आहे. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आज, सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने पठारावर हजारो पर्यंटकांची उपस्थिती रहाणार होती. पहाटे लवकर आलेल्या पर्यटकांना आता अडचण निर्माण झाली आहे. यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक अडकले आहेत. घाट खचल्याने घटनास्थळी प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, पर्यायी मार्गावरून जुन्या राजमार्गाने म्हणजेच (महाबळेश्वर मार्गे) वाहतूक वळविली आहे. यवतेश्वर घाटातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर लवकरात लवकर करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू
यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. कास पठाराकडे जाण्यासाठी लहान वाहनांसाठी एका साईडने या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
दरड कोसळल्यापासून एका तासाच्या आत एका साईडने लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सिंघल यांनी सांगितले.