अ‍ॅपशहर

संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या यशाबद्दल उदयनराजेंना शंका, कारण...

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे भोसले यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Authored byगणेश कदम | Lipi 28 Feb 2022, 2:06 pm
सातारा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात वेगळंच वक्तव्य केलं आहे. संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sambhajiraje-Udayanraje
संभाजीराजे भोसले-उदयनराजे भोसले


वाचा: उदयनराजे भडकले; म्हणाले, राज्यपालांनी इतिहास वाचायला हवा होता!

सातारा इथं ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजेंच्या आंदोलनला यश कसं येणार? सरकारच उदासीन असेल तर आंदोलनाला यश कसं येणार, असा सवाल उदयनराजेंनी केला आहे. 'कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये असं माझं मत आहे. दर दहा वर्षांनी जनगणना घेऊन कोणत्या जातीची लोकसंख्या किती वाढली आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. मागे आम्ही श्वेतपत्रिकेची मागणी केली होती, ती आली नाही. सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे किती पैसे आहेत हेही समोर आलं पाहिजे. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल तरुणांची संख्या मोठी आहे. त्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मराठा वा इतर कोणत्याही समाजातील सधन कुटुंबांना आरक्षण दिलंच जाऊ नये, असं ते म्हणाले.

वाचा: शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांचं वक्तव्य; सुप्रिया सुळेंचं सणसणीत उत्तर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'जो इतिहास आहे तो आहे. तो बदलता येत नाही, असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज