सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी हस्तक्षेप करत काल नवी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेमुळे खासदार उदयनराजे हे समाधानी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी चर्चा किंवा मध्यस्थी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करणे गरजेचे असून त्यांनी त्या-त्या राज्यांमधील प्रमुख राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे सांगताना तुमचे राजकारण होऊन जाते आणि लोकांची मात्र वाताहत होते, असा शब्दात टोला खासदार उदयनराजे यांनी लगावला आहे. आपले मत व्यक्त करताना उदयनराजे यांनी भाजपला घरचा अहेर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. तसेच उदयनराजे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मध्यस्थी मान्य नाही का, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. खासदार उदयनराजे हे साताऱ्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सीमावादावर आपले मत मांडताना खासदार उदयनराजे म्हणाले की, भाषावार प्रांतरचना होणे अपेक्षित होते, पण ती तशी झाली नाही. सीमावादावर महाजन समिती बसवली गेली. मात्र त्याला ते काम जमले नाही. त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती, असे सांगतानाच तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे. या मध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होते, असे मत उदयनराजे यांनी मांडले आहे.
क्लिक करा आणि वाचा- सीमावादासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तटस्थ, न्याय्य भूमिका घ्यावी, अमित शहांना शिंदे-फडणवीसांची विनंती
उदयनराजे पुढे म्हणाले की, भाषावार प्रांतरचना व्हावी असे त्यावेळी ठरले होते. मग ती झाली का? हा कॉमनसेन्स आहे. हे लोक कॉमनसेन्सला अनकॉमन का म्हणतात मला काही कळत नाही. ज्या महाजन नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, त्याला ते जमलं नाही. किंवा त्याची कुवत नव्हती. त्याची बौद्धिक पात्रता नव्हती किंवा मग त्याची इच्छाशक्ती नव्हती.
क्लिक करा आणि वाचा- महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून 'ब्रेक', नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार
पंतप्रधानांनी सीमावादावर राजकीय नेते, पक्ष, संधटनांना निमंत्रित करावे- उदयराजे
केंद्रात प्रमुख कोण आहे, पंतप्रधान. म्हणून पंतप्रधानांनी प्रमुख राजकीय लोक, पक्ष आणि संघटनांना निमंत्रित करावं आणि सांगावं. लोकांची वाताहत होते, तुमचं राजकारण होऊन जातं. विकास खुंटतो कोणाचा?, प्रगती खुंटते कोणाची?, तर त्या सीमेवर राहणाऱ्या लोकांची. मग ते महाराष्ट्रातील असतील किंवा कर्नाटकातील असतील. त्यांची काय चूक आहे. तुम्ही माणुसकीचा विचार करणार की नाही की माणुसकी संपुष्टात आली, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! विम्याच्या पैशांसाठी कटात सहभागी मित्रालाच संपवले, अपघाताचा बनाव रचला, शेवटी...
क्लिक करा आणि वाचा- सीमावादासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तटस्थ, न्याय्य भूमिका घ्यावी, अमित शहांना शिंदे-फडणवीसांची विनंती
उदयनराजे पुढे म्हणाले की, भाषावार प्रांतरचना व्हावी असे त्यावेळी ठरले होते. मग ती झाली का? हा कॉमनसेन्स आहे. हे लोक कॉमनसेन्सला अनकॉमन का म्हणतात मला काही कळत नाही. ज्या महाजन नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, त्याला ते जमलं नाही. किंवा त्याची कुवत नव्हती. त्याची बौद्धिक पात्रता नव्हती किंवा मग त्याची इच्छाशक्ती नव्हती.
क्लिक करा आणि वाचा- महामार्गांवर अनियंत्रितपणे धावणाऱ्या वाहनांना करकचून 'ब्रेक', नवी वेगमर्यादा निश्चित होणार, लवकरच नियम येणार
पंतप्रधानांनी सीमावादावर राजकीय नेते, पक्ष, संधटनांना निमंत्रित करावे- उदयराजे
केंद्रात प्रमुख कोण आहे, पंतप्रधान. म्हणून पंतप्रधानांनी प्रमुख राजकीय लोक, पक्ष आणि संघटनांना निमंत्रित करावं आणि सांगावं. लोकांची वाताहत होते, तुमचं राजकारण होऊन जातं. विकास खुंटतो कोणाचा?, प्रगती खुंटते कोणाची?, तर त्या सीमेवर राहणाऱ्या लोकांची. मग ते महाराष्ट्रातील असतील किंवा कर्नाटकातील असतील. त्यांची काय चूक आहे. तुम्ही माणुसकीचा विचार करणार की नाही की माणुसकी संपुष्टात आली, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! विम्याच्या पैशांसाठी कटात सहभागी मित्रालाच संपवले, अपघाताचा बनाव रचला, शेवटी...