अ‍ॅपशहर

साताऱ्यात थैमान : १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता; ३ हजार २४ पशूधनांचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण ३ एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टीमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2021, 10:02 pm

हायलाइट्स:

  • तीन-चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टी
  • जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना केलं स्थलांतरित
  • एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण बेपत्ता
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satara flood
सातारा पूरस्थिती
सातारा : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता, ३ हजार २४ पशूधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले असून एनडीआरएफच्या काही टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पूर्णत: व २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.

Kolhapur still at risk of floods: कोल्हापुरात महापुराचा विळखा सैल, मात्र पुराचा धोका कायम

जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण बेपत्ता आहेत तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात ३ मृत व्यक्ती, २ जण बेपत्ता व २० मृत पशुधन, कराड तालुक्यात ३ हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात १२ मृत व्यक्ती व २० जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात १ मृत व्यक्ती व २ मृत पशुधन, सातारा तालुक्यात २ मृत पशुधन, जावली तालुक्यात २ मृत व्यक्ती व २ जण बेपत्ता झाले आहेत.

जिल्ह्यातील १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जण स्थलांतरित

जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज