अ‍ॅपशहर

राजकीय आखाडा! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांच्या भर कार्यक्रमात एकमेकांना कोपरखळ्या

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. असाचा काही प्रकार साताऱ्यातही समोर आला आहे. दोन नेत्यांनी भर कार्यक्रमात एकमेकांना चिमणे काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2022, 11:00 am
सातारा : साताऱ्यात शुक्रवारी पोलीस दलाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दोन मंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सहकारमंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर आल्याने दोघांनी एकमेकांना चांगलेचं चिमटे काढले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp shivsena
ncp shivsena


या कार्यक्रमात शंभुराज देसाई म्हणाले की, 'मी गृहराज्यमंत्री जरी असलो तरी पालकमंत्रीच जिल्ह्याचे मालक असतात, असं बाळासाहेब पाटील मघाशी म्हणाले. त्यामुळे ते जसं सांगतील त्याला होयबा म्हणायचं आणि पुढे जायचं' अशा पद्धतीचा चिमटा शंभुराज देसाई यांनी आणि बाळासाहेब पाटील यांना काढला. यानंतर बाळासाहेब पाटील यांनी देखील संधी सोडली नाही. ते म्हणाले की, 'तुमच्या मतदारसंघातील पोलीसांना जास्त काम करावं लागतं. आपण गृहराज्यमंत्री आहात, त्यामुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांना सजग, सतर्क रहावं लागतं. तरीही, आपण सुरक्षेसाठी हेल्मेट वापरलं पाहीजे.'

धक्कादायक! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन
'गृहमंत्री सुद्धा बऱ्याच वेळा मोटरसायकलवरून फिरतात आम्ही तुमची बाईकवरून फिरतानाची क्लिप बघितली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे. तुम्ही हेल्मेट वापरत नाही', असं सांगत पाटलांनी देसाईंना कोपरखळी मारली.

सातारा पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा ते हेल्मेट वापरतात का हे बघावं, असं सुचक वक्तव्य बाळासाहेब पाटील यांनी केलं. खरंतर, शंभुराज देसाई हे पाटण मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत तर बाळासाहेब पाटील हे राष्ट्रावादीकडून कराड उत्तर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. दोघांचे पक्ष वेगळे आहेत आणि दोघेही परंपरागत राजकीय विरोधक आहेत. सध्या महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र काम करत असले तरी संधी भेटली की हे नेते एकमेकांना चिमटे काढणं आणि कोपरखळ्या मारणं अजिबात सोडत नाहीत. याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज