अ‍ॅपशहर

ट्रिपल मर्डरने महाराष्ट्र हादरला! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं

साताऱ्यामध्ये तिहेरी हत्याकांडाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिरसरात भीतीचं वातावरण असून पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2022, 12:46 pm
सातारा : साताऱ्यामध्ये ट्रिपल मर्डरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे आईचा गळा दाबून खून केल्यानंतर दोन मुलांनाही विहिरीमध्ये ढकलून त्यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satara crime news


मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथील विवाहिता योगिता दत्ता नामदास (वय ३८) हिचा अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराकडून गळा दाबून खून करण्यात आला. तर यानंतर भयंकर म्हणजे तिच्या दोन मुलांनाही विहिरीत ढकलून त्यांचाही खून करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

कारागृहात गांजा पोहोचवण्याचा नवीन फंडा, जेलमध्ये असं काही पाहिलं की पोलिसही हैराण
दत्ता नारायण नामदास असं आरोपीचं नाव असून ते तो मूळचा राजे बोरगाव ता. जि. उस्मानाबादचा आहे. सध्या तो वेलंग शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं राहत होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज