अ‍ॅपशहर

Udayanraje Bhosale: 'मी वयाने लहान! वडीलधाऱ्या मराठा नेत्यांनी तीन दशके काय केले?'

Udayanraje Bhosale मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राज्यात यावरून राजकारण तापलं आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी या प्रश्नावरून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेत्यांना लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2020, 12:30 am
सातारा: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलायला मी वयाने अत्यंत लहान आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक ज्येष्ठ व वडीलधारी राजकीय मंडळी आहेत. गेल्या तीन दशकात मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने काय केले? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे, असे नमूद करतानाच मराठा आरक्षणात वारंवार राजकारण होत असल्याची टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ( Udayanraje Bhosale On Maratha Reservation Latest News Updates )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम उदयनराजे भोसले


वाचा: मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नका; मुख्यमंत्र्यांना निवेदन

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची निवड झाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उदयनराजे पालिकेत आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत विचारले असताना त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत कुणाचाही नामोल्लेख न करता ज्येष्ठ मराठा नेत्यांना लक्ष्य केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भात वारंवार राजकारण होत असल्याने हे आरक्षण मिळेनासे झाले आहे. योग्य वेळ आल्यावर या विषयावर मी बोलणारच आहे. पण महाराष्ट्रात माझ्यापेक्षा राजकारणात वडीलधारी मंडळी आहेत. गेल्या ३० वर्षात त्यांनी या विषयावर का आवाज उठविला नाही, हा आमच्या सारख्यांचा प्रश्न आहे, असे उदयनराजे म्हणाले. मराठा आरक्षणावर योग्य भूमिका घेतली गेली नाही तर उद्रेक होईल. लहानपणीचे मित्र आरक्षणामुळे एकमेकांकडे संशयाने पहात आहेत. मराठा आरक्षण या विषयावर उगाच अहंभाव बाळगणाऱ्यांच्या वाऱ्याला सुद्धा मी उभा राहणार नाही. मात्र ही माझी वैयक्तिक मते आहेत. माझ्या मतांवर अनेक मतांतरे होणार हे मला ठाऊक आहे, असे नमूद करत मी जे बोलतो ते आंतरिक तळमळीने बोलतो असे उदयनराजे म्हणाले.

वाचा: 'तो' फडणवीस सरकारचाच प्लान होता; सचिन सावंतांनी सगळे पुरावेच दिले!

जात पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारताना कधी जातीचा विचार केला नाही, असे नमूद करतानाच १९८९ साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या मग त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय का पुढे आला नाही?, असा सवाल उदयनराजेंनी केला. मराठा आरक्षणात राजकारण केले जात असल्याने प्रत्यक्षात ते लागू होण्यासंदर्भात प्रचंड अडचणी येत आहेत, असा आरोप करताना आरक्षण दिले नाही तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

वाचा: बंद लखोट्यात आहेत 'ही' नावे!; राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज