टाइम्स न्यूज नेटवर्क । मुंबई
रेल्वे अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले तरी स्वप्नाची भरारी घेण्याचं बळ तिच्या पंखात कायम होतं. २४ वर्षांच्या रोशन जव्वादला डॉक्टर व्हायचं होतं. पण २००८ मधल्या त्या अपघातानंतर तिचं हे स्वप्न कोमेजणार होतं. ७० टक्के अपंगत्व असेल तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, पण रोशनचं अपंगत्व ८८ टक्के होतं. अखेर न्यायाधीशांनी रोशनची जिद्द पाहिली आणि तिला न्याय दिला. रोशन शिकली. नुकतंच मंगळवारी तिच्या नावासमोर डॉक्टर हे बिरुद अभिमानानं मिरवलं.
अपघातानंतर तब्बल नऊ वर्षांच्या संघर्षानंतर रोशनने एमबीबीएस पदवी मिळवली. तिच्या कुटुंबातली ती पहिली डॉक्टर आहे. वडिल जव्वाद शेख भाजीविक्रेते आहेत, तर आई अन्सारी खातून गृहिणी. एक मोठा भाऊ आणि लहान बहिण अशा कुटुंबकबिल्यासह रोशन जोगेश्वरीला एका चाळीत राहते. रोशन लहानपणापासून हुशार होती. २००८ ला दहावीला तिला ९२.१५ टक्के मिळाले होते. त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला ती वांद्र्याच्या अंजुमन-ए-इस्लाम कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी येत होती. लोकलच्या गर्दीत अंधेरीजवळ ती बाहेर फेकली गेली आणि ट्रॅकवर कोसळली. ट्रेन पायांवरून गेली, ती किंचाळत होती. प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. तिचा जीव वाचला होता, पण दोन्ही पाय गमावले होते. या धक्क्यातून सावरायला तिला तब्बल एक वर्ष लागलं. शिक्षण थांबलं होतं. पण पाय गमावले तरी ती पुन्हा जिद्दीनं उभी राहिली.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ती उत्तीर्ण झाली. पण ८८ टक्के अपंगत्वाचे कारण पुढे करत तिला मेडिकलला प्रवेश नाकारण्यात आला. तिने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी 'ती न्यायालयापर्यंत येऊ शकते तर कॉलेजमध्ये का जाऊ शकणार नाही?' असा सवाल करत तिला प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. 'केईएममध्ये शिकत असताना मी वसतिगृहात राहात होते. माझे सगळे वर्गमित्र, शिक्षक मला मदत करायचे. माझ्या यशाचं श्रेय या सर्वांना आहे,' रोशन सांगत होती.
रोशनला एमबीबीएसला फर्स्ट क्लास मिळाला आहे. आता तिला पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण करायचं आहे. ती म्हणाली, 'मी माझ्या गावी आझमगडला रुग्णालय सुरू करणार आहे. तिथे चांगले रुग्णालय नाही, त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या खूप समस्या आहेत.'
रेल्वे अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले तरी स्वप्नाची भरारी घेण्याचं बळ तिच्या पंखात कायम होतं. २४ वर्षांच्या रोशन जव्वादला डॉक्टर व्हायचं होतं. पण २००८ मधल्या त्या अपघातानंतर तिचं हे स्वप्न कोमेजणार होतं. ७० टक्के अपंगत्व असेल तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, पण रोशनचं अपंगत्व ८८ टक्के होतं. अखेर न्यायाधीशांनी रोशनची जिद्द पाहिली आणि तिला न्याय दिला. रोशन शिकली. नुकतंच मंगळवारी तिच्या नावासमोर डॉक्टर हे बिरुद अभिमानानं मिरवलं.
अपघातानंतर तब्बल नऊ वर्षांच्या संघर्षानंतर रोशनने एमबीबीएस पदवी मिळवली. तिच्या कुटुंबातली ती पहिली डॉक्टर आहे. वडिल जव्वाद शेख भाजीविक्रेते आहेत, तर आई अन्सारी खातून गृहिणी. एक मोठा भाऊ आणि लहान बहिण अशा कुटुंबकबिल्यासह रोशन जोगेश्वरीला एका चाळीत राहते. रोशन लहानपणापासून हुशार होती. २००८ ला दहावीला तिला ९२.१५ टक्के मिळाले होते. त्याच वर्षी १६ ऑक्टोबरला ती वांद्र्याच्या अंजुमन-ए-इस्लाम कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी येत होती. लोकलच्या गर्दीत अंधेरीजवळ ती बाहेर फेकली गेली आणि ट्रॅकवर कोसळली. ट्रेन पायांवरून गेली, ती किंचाळत होती. प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. तिचा जीव वाचला होता, पण दोन्ही पाय गमावले होते. या धक्क्यातून सावरायला तिला तब्बल एक वर्ष लागलं. शिक्षण थांबलं होतं. पण पाय गमावले तरी ती पुन्हा जिद्दीनं उभी राहिली.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ती उत्तीर्ण झाली. पण ८८ टक्के अपंगत्वाचे कारण पुढे करत तिला मेडिकलला प्रवेश नाकारण्यात आला. तिने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी 'ती न्यायालयापर्यंत येऊ शकते तर कॉलेजमध्ये का जाऊ शकणार नाही?' असा सवाल करत तिला प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. 'केईएममध्ये शिकत असताना मी वसतिगृहात राहात होते. माझे सगळे वर्गमित्र, शिक्षक मला मदत करायचे. माझ्या यशाचं श्रेय या सर्वांना आहे,' रोशन सांगत होती.
रोशनला एमबीबीएसला फर्स्ट क्लास मिळाला आहे. आता तिला पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण करायचं आहे. ती म्हणाली, 'मी माझ्या गावी आझमगडला रुग्णालय सुरू करणार आहे. तिथे चांगले रुग्णालय नाही, त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या खूप समस्या आहेत.'