अ‍ॅपशहर

'पालकमंत्र्यांनी बैठकीला दोन वेळेचा डब्बा घेऊनच यावं, कारण...' नितेश राणेंचे उदय सामंतांवर टीकास्त्र

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज होणारी नियोजन बैठक वादळी होणार असल्याचे संकेत दिले असून जिल्हा परिषदेचा विकास निधी परत जात असल्याने सर्व विषय वादळी ठरणार आहे.

Maharashtra Times 16 Nov 2021, 10:17 am
सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठक आज १६ नोव्हेंबरला जिल्याचं मुख्यालय ओरोस येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. राणेंच्या हातातून पालकमंत्री पद गेल्यानंतर जिल्हा नियोजन बैठक नेहमीच वादळी ठरत आहे. आता तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज होणारी नियोजन बैठक वादळी होणार असल्याचे संकेत दिले असून जिल्हा परिषदेचा विकास निधी परत जात असल्याने सर्व विषय वादळी ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitesh rane


जिल्हा नियोजनचा निधी नियमबाह्य पध्दतीने वितरित करणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नातेवाईकांचा जिल्ह्यातील कारभारात ढवळाढवळ, जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, जिल्ह्यात अनधिकृत व नियमबाह्य काम सुरू असल्याचे आरोप करत आमदार नितेश राणे यांनी केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख करत पालकमंत्र्यांना घाम फोडल्याशीवाय "तो काय" रत्नागिरीला परत जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दोन वेळेचा डब्बा घेऊन नियोजन बैठकीत यावं. फुलपाखरासारखं आलं आणि गेलं तस काही होणार नाही, असं सांगत आज होणारी जिल्हा नियोजन बैठक वादळी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नवाब मलिकांनी उघड केलं 'ते' व्हॉट्सअॅप चॅट; समीर वानखेडेंवर साधला निशाणा
या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज