अ‍ॅपशहर

उड्डाणपुलावरून पडून ११ काळविटांनी गमावला जीव, अचानक समोर वाहन आल्याने बिथरला कळप

14 Deer lost lives : सोलापुरातील उड्डाणपुलावरून आपला जीव वाचवण्यासाठी हरणांच्या कळपाने उड्या मारल्या. मात्र जीव वाचण्याऐवजी यावेळी काळविटांचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वाहनाच्या कर्कश आवाजामुळे ही हरणे भेदरली होती. जीव वाचवण्यासाठी ही हरणे पळत सुटली आणि त्यांनी उड्डाणपुलावरून उड्या घेतल्या. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

| Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2023, 12:11 am
सोलापूर: आपला जीव वाचवण्यासाठी भेदरलेल्या काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्या आणि त्यात जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोलापुरात घडला आहे. नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण ११ काळविटांनी आपले जीव गमावले असून ३ काळविटं जखमी झाली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 deer lost their lives after jumping from a flyover (File Photo)
१४ हरणांनी गमावला जीव


या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली पडला आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेती माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जवळपास ११ काळविटांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य; शारीरिक शिक्षणाच्या तासाला विद्यार्थिनींना..., नंतर असे मेसेज करायचा

या घटनेच्या अनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ‘या भागातून नेहमीच काळविटं आणि इतर प्राणी रस्ता ओलांडत असतात. वाहनांच्या आवाजाने घाबरून काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्याची शक्यता वर्तवली आहे. घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने काळविटांच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल' असा अंदाज सोलापूर वन विभागाचे प्रमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी वर्तवला आहे.

क्लिक करा आणि वाचा- गुन्हा दाखल होणे म्हणजे...; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबरोबर बच्चू कडू बोलले

महामार्गावर नेहमीच हरणांचे मृत्यू होतात

केगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह, काळवीट व इतर वन्य प्राण्यांच्या व कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात. रस्त्यावरील वाहनांमुळे भीतीने पुढे पळत असताना अपघात होतात. उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातात. असे प्रकार नेहमीच घडतात, असे केगाव परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- ती तुरुंगवास भोगून बाहेर आली, लोकांनी घेतला धसका, गाठले पोलीस ठाणे...; कोण आहे नाझिया?

महत्वाचे लेख