सोलापूर: शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज बुधवारी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला.यामध्ये महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे, तर कंत्राटी कर्मचारी जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे. (an electrician was lost life and another was injured) सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखेअंतर्गत बुधवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय २२ वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले होते.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! सासूच्या घरी जावयाने केली चोरी; जावयासह मुलीवर गुन्हा दाखल
या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.गंभीर जखमी झालेले महावितरणचे कर्मचारी शेख रब्बानी अहमद यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर कंत्राटी कर्मचारी तांबोळी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- दुर्दैवी! पोहता येत नसतानाही शेततळ्यात गेले, तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षक यांच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
क्लिक करा आणि वाचा- '... तर आणि तरच धार्मिक स्थळांना मिळणार भोंग्यांसाठी परवानगी'; पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! सासूच्या घरी जावयाने केली चोरी; जावयासह मुलीवर गुन्हा दाखल
या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.गंभीर जखमी झालेले महावितरणचे कर्मचारी शेख रब्बानी अहमद यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर कंत्राटी कर्मचारी तांबोळी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- दुर्दैवी! पोहता येत नसतानाही शेततळ्यात गेले, तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षक यांच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
क्लिक करा आणि वाचा- '... तर आणि तरच धार्मिक स्थळांना मिळणार भोंग्यांसाठी परवानगी'; पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट