सुनील दिवाण, पंढरपूर
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पाहणीसाठी आलेले पथक आले आणि गेलेसुद्धा . सध्या जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना केंद्रीय पथकाने ज्या झपाट्याने दौरा उरकला ते पाहता हा केवळ फार्स असल्याची चर्चा शेतकरी आता करु लागले आहेत.
दुष्काळाच्या पाहणीसाठी आज सकाळी आठ वाजता या पथकातील गाड्यांचा ताफा आंधळगाव येथे पोचला. रस्त्याच्याकडेला असलेल्या सिताराम वेळापुरे यांच्या शेतात उभ्या उभ्या दोन मिनिटांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपली तळमळ कळावी म्हणून दिल्लीच्या साहेबांशी मोडक्या तोडक्या हिंदी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करत शेतकरी दुष्काळाची दाहकता सांगण्याचा प्रयत्न करत होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून जनावरांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून चारा विकत घ्यावा लागत असल्याची कैफीयत शेतकऱ्यांनी मांडली. सध्या पावसाअभावी पेरण्याच झाल्या नसल्यानं जगणं मुश्किल झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. फळबागांना जगवण्यासाठी टॅंकरने विकत पाणी घ्यावं लागतंय. यामुळे लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पथकातील आधिकाऱ्यांनी सर्व टिपणे नोंद करुन घेतल्या. यावेळी आपले गाऱ्हाणे सांगायला आलेल्या ८५ वर्षाच्या अपंग आजोबाकडे मात्र आधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आपली व्यथा न मांडताच त्यांना पुन्हा कुबड्यावर चालत परतावे लागले. आज दिवसभरात सांगली, सातारा जिल्हा करुन पथकाला पुण्याला पोहचायचे असल्याचं यावेळी आयुक्त दिपक म्हैसेकर म्हणाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मनरेगातून १ कोटी ३२ लाख मजुरांना काम देण्याची तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राच्या पथकाने फक्त रस्त्याकडेला असलेल्याच शेताची पाहणी केल्याने यांना जिल्ह्यातला दुष्काळ कसा कळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पाहणीसाठी आलेले पथक आले आणि गेलेसुद्धा . सध्या जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना केंद्रीय पथकाने ज्या झपाट्याने दौरा उरकला ते पाहता हा केवळ फार्स असल्याची चर्चा शेतकरी आता करु लागले आहेत.
दुष्काळाच्या पाहणीसाठी आज सकाळी आठ वाजता या पथकातील गाड्यांचा ताफा आंधळगाव येथे पोचला. रस्त्याच्याकडेला असलेल्या सिताराम वेळापुरे यांच्या शेतात उभ्या उभ्या दोन मिनिटांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपली तळमळ कळावी म्हणून दिल्लीच्या साहेबांशी मोडक्या तोडक्या हिंदी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करत शेतकरी दुष्काळाची दाहकता सांगण्याचा प्रयत्न करत होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून जनावरांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून चारा विकत घ्यावा लागत असल्याची कैफीयत शेतकऱ्यांनी मांडली. सध्या पावसाअभावी पेरण्याच झाल्या नसल्यानं जगणं मुश्किल झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. फळबागांना जगवण्यासाठी टॅंकरने विकत पाणी घ्यावं लागतंय. यामुळे लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पथकातील आधिकाऱ्यांनी सर्व टिपणे नोंद करुन घेतल्या. यावेळी आपले गाऱ्हाणे सांगायला आलेल्या ८५ वर्षाच्या अपंग आजोबाकडे मात्र आधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आपली व्यथा न मांडताच त्यांना पुन्हा कुबड्यावर चालत परतावे लागले. आज दिवसभरात सांगली, सातारा जिल्हा करुन पथकाला पुण्याला पोहचायचे असल्याचं यावेळी आयुक्त दिपक म्हैसेकर म्हणाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मनरेगातून १ कोटी ३२ लाख मजुरांना काम देण्याची तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राच्या पथकाने फक्त रस्त्याकडेला असलेल्याच शेताची पाहणी केल्याने यांना जिल्ह्यातला दुष्काळ कसा कळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.