अ‍ॅपशहर

डेंग्यूमुळे चार दिवसात सख्ख्या भावांचा मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात चार दिवसांच्या अंतरावर दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 30 Oct 2018, 7:09 pm
पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dengue claim two brothers lives in pandharpur
डेंग्यूमुळे चार दिवसात सख्ख्या भावांचा मृत्यू


पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात चार दिवसांच्या अंतरावर दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आढीव येथे सध्या तापाच्या आजाराने अनेक गावकरी आजारी आहेत. ते पंढरपुरात येऊन उपचार घेत आहेत. अशातच चार दिवसांपूर्वी शिवाजी मारुती धाकतोडे या ३७ वर्षांच्या ग्रामस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू डेंग्युने झाल्याचे समोर आले होते. आता आज त्यांचाच मोठा भाऊ शहाजी धाकतोडे (वय ३९ ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील अस्वच्छता वाढल्याने डेंग्यूचा फैलाव झाला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने परिसरात तातडीने उपाययोजना सुरू करण्याची मागणी होतेय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज