सोलापूर: २००४ ते २०१४ पर्यंतच्या निवडणुका ईव्हीएमवर झाल्या, या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्यात. तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, पण जेव्हा मोदींनी धोबीपछाड दिला तेव्हा ईव्हीएम वाईट झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, पण जयसिद्धेश्वर महाराज निवडून आले तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे?', असा सवाल करतानाच ईव्हीएम खराब नाही, तर तुमची खोपडी खराब आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सोलापूर येथे जनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दोन्ही काँग्रेसच्या पैलवानांना चीत करण्यात आलं आहे. त्यांचे पैलवान उठायला तयार नाहीत. आमची सन्मानाची यात्रा असून त्याला जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढल्या पण त्यांची अवस्था वाईट होती, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी वेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास बोलून दाखवला. अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं त्यांच्या भाषणात सांगितलं. 'पराभवानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुधारले नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवलं असं सांगतात, अशी टीकाही त्यांनी केली.
सोलापूर येथे जनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दोन्ही काँग्रेसच्या पैलवानांना चीत करण्यात आलं आहे. त्यांचे पैलवान उठायला तयार नाहीत. आमची सन्मानाची यात्रा असून त्याला जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढल्या पण त्यांची अवस्था वाईट होती, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी वेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास बोलून दाखवला. अमित शाह यांनीही देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं त्यांच्या भाषणात सांगितलं. 'पराभवानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुधारले नाहीत. आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवलं असं सांगतात, अशी टीकाही त्यांनी केली.