पंढरपूर:
वैशाख वणवा पेटला असताना आज एकादशीसाठी हजारो भाविक आणि पर्यटकाची शहरात मोठी गर्दी उसळली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्याने भाविकांच्या सोबत हजारो पर्यटकही विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत असल्याने शहराला यात्रेचे स्वरुप आले आहे.
वैशाख महिन्यामुळे तापमानाचा पारा रोज चाळीशी ओलांडू लागला असुन पाणीटंचाईमुळे भाविकांचेही हाल होत आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदीर समितीने संपूर्ण दर्शन रांगेत शेकडोच्या संख्येने थंडगार पाण्याचे कॅन ठेवून पाणी वाटप सुरु केल्याने दर्शन रांगेतील भाविकांतुन समाधान व्यक्त होत आहे.
वैशाख वणवा पेटला असताना आज एकादशीसाठी हजारो भाविक आणि पर्यटकाची शहरात मोठी गर्दी उसळली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्याने भाविकांच्या सोबत हजारो पर्यटकही विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत असल्याने शहराला यात्रेचे स्वरुप आले आहे.
वैशाख महिन्यामुळे तापमानाचा पारा रोज चाळीशी ओलांडू लागला असुन पाणीटंचाईमुळे भाविकांचेही हाल होत आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदीर समितीने संपूर्ण दर्शन रांगेत शेकडोच्या संख्येने थंडगार पाण्याचे कॅन ठेवून पाणी वाटप सुरु केल्याने दर्शन रांगेतील भाविकांतुन समाधान व्यक्त होत आहे.