म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
'शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचा स्वार्थ हाच एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांसाठी, गोर-गरिबांसाठी किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे नाही. केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच ते एकत्र आले आहेत,' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकलूजमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, 'आम्हाला शेतीतील काय कळतं? असे म्हणणाऱ्यांच्या काळात अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत, बंद पडले आहेत. आम्ही पाच वर्षे एफआरपी वेळेत देण्याचे काम केले. यांनी दिलेली कर्जमाफी फसवी असून, कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जलयुक्त शिवारची कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, यांनी पाणी आडवा पाणी जिरवा ऐवजी एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा, असा पवित्रा घेतला आहे.'
या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
'शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचा स्वार्थ हाच एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांसाठी, गोर-गरिबांसाठी किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे नाही. केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच ते एकत्र आले आहेत,' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकलूजमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, 'आम्हाला शेतीतील काय कळतं? असे म्हणणाऱ्यांच्या काळात अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत, बंद पडले आहेत. आम्ही पाच वर्षे एफआरपी वेळेत देण्याचे काम केले. यांनी दिलेली कर्जमाफी फसवी असून, कर्जमाफीतून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जलयुक्त शिवारची कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, यांनी पाणी आडवा पाणी जिरवा ऐवजी एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा, असा पवित्रा घेतला आहे.'
या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.