सोलापूर : फळभाज्या नियमनमुक्तीला विरोध करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या बाहेरील पटांगणात विकून भरघोस कमाई केली.
बंदमुळे बाजार समितीमधील सुमारे सहा ते साडेसहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीमध्ये इंदूर आणि आग्रा येथून बटाटा तर हिमाचल प्रदेश व काश्मीर येथून सफरचंदांची आवक होते. तसेच कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक आणि अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर कांदा येतो. सांगोला तसेच पंढरपूर परिसरातून डाळिंबाचीसुद्धा मोठी आवक होते. भाजीपाल्याचे १२०० ते १३०० तर फळांचे २०० ते २५० आडते आहेत. शासनाने बाजार समिती कायद्यामधून फळे आणि भाजीपाला वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे आडत्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.
पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानात बसून विक्री केली. इतर वेळी मेथीची पेंडी दहा रुपयाला एक दराने विकली जाते; परंतु शेतकऱ्यांनी दहा रुपयांना दोन या भावाने पेंड्या विकल्या. ग्राहकांनीसुद्धा या स्वस्त पालेभाज्यांची वाढीव खरेदी केली. मात्र, या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे काही वेळातच हा बाजार उठविण्यात आला.
किरकोळ विक्रेतेही मालामाल
बाजार समितीच्या बाहेरील भागात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या मालाची विक्री केली; परंतु किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेऊन ग्राहकांना तो विकून काही प्रमाणात नफा कमावला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल, तोलार व स्त्री कामगार अशी २ हजार संख्या आहे. हमाल व तोलाई आडते हे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पट्टीतून वजा करत होते; परंतु नवीन नियमानुसार नेमकी हमाली व तोलाई कोणाकडून घ्यायची याबाबत धोरण ठरलेले नाही. हमाली व तोलाईची जबाबदारी बाजार समितीने स्वीकारावी आणि ती रक्कम माथाडी बोर्डात भरावी. बंदमुळे शेतकरी माल आणू शकत नाहीत. परिणामी हमाल व तोलारांवर बेरोजगारीची संक्रांत ओढवणार आहे.
दीपक गदगे,
सचिव, सोलापूर शहर तोलार कल्याणकारी संघटना
बंदमुळे बाजार समितीमधील सुमारे सहा ते साडेसहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीमध्ये इंदूर आणि आग्रा येथून बटाटा तर हिमाचल प्रदेश व काश्मीर येथून सफरचंदांची आवक होते. तसेच कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक आणि अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर कांदा येतो. सांगोला तसेच पंढरपूर परिसरातून डाळिंबाचीसुद्धा मोठी आवक होते. भाजीपाल्याचे १२०० ते १३०० तर फळांचे २०० ते २५० आडते आहेत. शासनाने बाजार समिती कायद्यामधून फळे आणि भाजीपाला वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे आडत्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.
पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानात बसून विक्री केली. इतर वेळी मेथीची पेंडी दहा रुपयाला एक दराने विकली जाते; परंतु शेतकऱ्यांनी दहा रुपयांना दोन या भावाने पेंड्या विकल्या. ग्राहकांनीसुद्धा या स्वस्त पालेभाज्यांची वाढीव खरेदी केली. मात्र, या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे काही वेळातच हा बाजार उठविण्यात आला.
किरकोळ विक्रेतेही मालामाल
बाजार समितीच्या बाहेरील भागात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या मालाची विक्री केली; परंतु किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेऊन ग्राहकांना तो विकून काही प्रमाणात नफा कमावला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल, तोलार व स्त्री कामगार अशी २ हजार संख्या आहे. हमाल व तोलाई आडते हे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पट्टीतून वजा करत होते; परंतु नवीन नियमानुसार नेमकी हमाली व तोलाई कोणाकडून घ्यायची याबाबत धोरण ठरलेले नाही. हमाली व तोलाईची जबाबदारी बाजार समितीने स्वीकारावी आणि ती रक्कम माथाडी बोर्डात भरावी. बंदमुळे शेतकरी माल आणू शकत नाहीत. परिणामी हमाल व तोलारांवर बेरोजगारीची संक्रांत ओढवणार आहे.
दीपक गदगे,
सचिव, सोलापूर शहर तोलार कल्याणकारी संघटना